शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची मुलगी अभिमानानं माणची सून बनावी

By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST

जयकुमार गोरे : समता पुरस्कार प्रदान ; दुष्काळी भागाची हरितक्रांतीकडे वाटचाल

खंडाळा : ‘स्वप्नं ही उघड्या डोळ्यांनी पाहायची असतात. माण-खटावच्या जलक्रांतीचे स्वप्न मी पाहिले होते. गेल्या पाच वर्षांत जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. साखळी सिमेंट बंधाऱ्याचे काम राज्याला दिशादर्शक ठरलेले आहे. माणची भूमी सुजलाम्-सुफलाम् व्हावी, तेथे हरितक्रांती घडावी हेच माझे पुढील स्वप्न आहे. बारामतीची मुलगी अभिमानाने माणची सून म्हणून येईल, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल,’ असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. अंदोरी, ता. खंडाळा येथे महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार देऊन आ. गोरे यांना गौरविण्यात आले. यावेळी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे, सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, अजय धायगुडे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, दिनेश वीरकर, शंकरराव क्षीरसागर, सुरेश रासकर, जयवंत शिंदे, महेंद्र माने, अतुल पवार, सुजित डेरे, विलास माने, अनिल क्षीरसागर आदी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘आपल्या राष्ट्रपुरुषांना दीडशे वर्षांपूर्वी जे कळले, ते आज राजकर्त्यांना उमगले आहे. त्यांच्या विचारांनी काम केले तरच राष्ट्राची प्रगती होणार आहे. समाजासाठी काम करणे हेच माझे ब्रीद वाक्य बनले आहे. माझ्या माण-खटावमधील माताभगिनींना सहा महिने केवळ पाणी आणण्याचे काम करावे लागत होते. मात्र, आता मी दुष्काळाचा कलंक पुसण्यात यशस्वी झालो आहे. आता शासनाने सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ योजना आमच्या माण-खटावचीच आहे. पाणी प्रश्नावर काम करताना मी इतिहास केला. मात्र, अंदोरीकरांनी मला पुरस्कारायोग्य समजून खऱ्या अर्थाने ‘जलनायक’ बनविले आहे.’ कार्यक्रमाला बाळासाहेब ननावरे, नानासाहेब ननावरे, संजय जाधव, सुधाकर होवाळ, भिकू ननावरे, किसन ननावरे, दत्तात्रय दगडे, धनाजी जाधव, वसंत दगडे, विश्वास दगडे, शांतराम होवाळ, ज्योतिराम दगडे, नामदेव ननावरे, पंडित ननावरे, नवनाथ ससाणे, रवींद्र दगडे आदी उपस्थित होते. प्रकाश दगडे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर ससाणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)फुले दाम्पत्यांचा आदर्श...‘माण आणि खटाव तालुक्यांत आणखीही जल साठवणुकीचे काम होणे महत्त्वाचे आहे. त्या तालुक्यात हरितक्रांती घडावी हे माझे स्वप्न आहे, म्हणून दीडशे वर्षांपूर्वी फुले दाम्पत्यांनी केलेल्या कामाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करीत आहे,’ असेही आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.