शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाॅंधार पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाॅंधार पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पेरणीसाठी मशागत केलेल्या शेतातील माती वाहून गेली आहे तर बामणवाडी येथे घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुका चाराही भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

कुसूर परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पडलेल्या धुवाॅंधार पावसाने शेताचे मोठ्या नुकसान झाले आहे. बामणवाडी येथील डोंगरातून येणारे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने पावसाचे पाणी थेट गावात शिरले. यामुळे शेवंताबाई जालिंदर काटेकर यांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात, जनावरांच्या शेडमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. तर खरीप हंगाम पेरणीसाठी मशागत केलेल्या शेतातील माती वाहून गेली आहे. गत चार दिवसांपासून काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. पेरणी केलेली शेते बियाण्यासह पाण्याने धुवून नेल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बामणवाडी येथील डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह काही लोकांनी बंद केल्याने सर्व पाणी गावात घुसले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले हे पाणी अनेक घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता नुकसानग्रस्तांमधून विचारला जात आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद केलेल्यांवर कारवाई करून हे प्रवाह पूर्ववत करून गावात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी होत आहे.

फोटो ०४ कुसूर-रेन

कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे शनिवारी मान्सूनपूर्व पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. (छाया : गणेश काटेकर)