शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भुरकवाडी ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

खटाव : जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू असताना भुरकवाडी (ता. खटाव) येथे मात्र नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून ...

खटाव : जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू असताना भुरकवाडी (ता. खटाव) येथे मात्र नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून भुरकवाडी ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर षटकार मारून सलग सहाव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून महिलाराज देण्याचा यशस्वी प्रयोग राबवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून राज्यात पहिले महिला धोरण आणत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. शरद पवार यांच्या विचारधारेवर चालत असताना भुरकवाडी ग्रामस्थांनी मात्र ग्रामपंचायतीमध्ये सात महिला सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ललिता कदम, मनीषा कदम, शीतल कदम, रेश्मा कदम, रंजना कदम, सुजाता गाढवे, सुलोचना कुंभार यांची निवड केली आहे.

गावामध्ये महिला पदाधिकारी म्हणून सोसायटीच्या संचालिका सुशीला कदम, सुलोचना पवार काम पाहत आहेत तर अधिकारी म्हणून ग्रामसेविका धनश्री गमरे, आरोग्यसेविका जंगम, प्राथमिक शाळेच्या दोन महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनीषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, आशा सेविका रेश्मा फडतरे, सीमा जाधव काम पाहत आहेत.

१९९५ सालापासून कै. गणपतराव कदम (आबा) कै.रामभाऊ पाटील यांच्या व ग्रामस्थांच्या कल्पकतेतून आजही २०२१ पर्यंत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा इतिहास कायम ठेवत २०२१ पर्यंत सलग ३० वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबरोबर सातही महिला सदस्य देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. या बिनविरोध निवडीकामी गावातील ग्रामस्थांबरोबर महिला वर्ग, तरुण वर्गानेही उत्स्फूर्तपणे भाग घेऊन राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

११भुरकवाडी

कॅप्शन : भुरकवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या नूतन महिला सदस्यांसमवेत ग्रामसेविका धनश्री गमरे उपस्थित होत्या.