शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

नारायण राणेंना महाराष्ट्र विसरलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

कऱ्हाड : ‘नारायण राणे यांना महाराष्ट्र विसरलाय. त्यांच्याच पक्षातले त्यांना किंमत देत नाहीत. मग, मी बोलणे योग्य ठरणार नाही’, ...

कऱ्हाड : ‘नारायण राणे यांना महाराष्ट्र विसरलाय. त्यांच्याच पक्षातले त्यांना किंमत देत नाहीत. मग, मी बोलणे योग्य ठरणार नाही’, अशा शब्दांत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंची खिल्ली उडविली.

येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री देसाई यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली, तर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने ट्विट केले होते. यावर बोलताना देसाई म्हणाले, कंगना रनौतच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार सर्वांनीच करायला हवा. महाराष्ट्रात राहायचं, करिअर करायचं. महाराष्ट्रातील लोकांच्या जीवावर मोठं व्हायचं आणि इथल्या पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही म्हणायचं, हे अजब आहे. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा, असे म्हणणाऱ्या कंगना रनौतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

या प्रकरणात पोलिसांचे नाव कोठेही मलिन झालेले नाही. महाराष्ट्र पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असताना त्यांच्यावर अविश्वास दाखवून तपास इतरत्र देणे बरोबर नाही. केंद्राने केलेला हस्तक्षेप योग्य नाही, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

......................................................................