शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Satara: महाराणी ताराराणी यांची समाधी अजूनही दुर्लक्षित, जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

By सचिन काकडे | Updated: April 20, 2023 18:04 IST

एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते.

सातारा : साताऱ्यातील संगममाहुली येथे असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या हालचाली गतिमान झाल्या असताना आता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा विषयही चर्चेत आला आहे. पुरातत्व विभागाने या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा तर राजाराम महाराजांच्या पत्नी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम केले. एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांचे काही काळ वास्तव्य होते. किल्ल्यावर १७६१ रोजी देहावसान झाल्यानंतर त्यांची संगममाहुली येथे कृष्णा नदी काठावर समाधी बांधण्यात आली. साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने दिवंगत शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ रोजी या समाधीचा शोध घेतला होता.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा इतिहास अभ्यासकांनी शोध लावला. सुस्थितीत असलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींनीही एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, संगममाहुलीत कित्येक वर्षांपासून जीर्णाेद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराणी ताराराणींच्या समाधीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना पुरातत्व विभागाचे. इतिहासाच्या या पाऊलखुणांचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

ही तर सातारकरांची जबाबदारी..साताऱ्यातील संगममाहुली हे एक धार्मिक क्षेत्र असून, येथील पुरातन मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देतात. मात्र, आजमितीला हे सांस्कृतिक वैभव निस्तेज होऊ लागलेय, ते केवळ आपल्या अनास्थेपायी. या घाटावर राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या समाधी असून, इतिहास अभ्यासकांमुळे त्या हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे, ही सातारकरांचीच जबाबदारी आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच संगममाहुलीतील महाराणी येसूबाई यांच्या समाधीची पाहणी केली. यावेळी घाटावर असलेल्या राजघराण्यातील अन्य सदस्यांच्या समाधीची त्यांनी माहिती दिली. या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील. - सुहास राजेशिर्के, संस्थापक, महाराणी येसूबाई फाउंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर