शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Satara: महाराणी ताराराणी यांची समाधी अजूनही दुर्लक्षित, जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

By सचिन काकडे | Updated: April 20, 2023 18:04 IST

एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते.

सातारा : साताऱ्यातील संगममाहुली येथे असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या हालचाली गतिमान झाल्या असताना आता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा विषयही चर्चेत आला आहे. पुरातत्व विभागाने या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा तर राजाराम महाराजांच्या पत्नी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम केले. एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांचे काही काळ वास्तव्य होते. किल्ल्यावर १७६१ रोजी देहावसान झाल्यानंतर त्यांची संगममाहुली येथे कृष्णा नदी काठावर समाधी बांधण्यात आली. साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने दिवंगत शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ रोजी या समाधीचा शोध घेतला होता.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा इतिहास अभ्यासकांनी शोध लावला. सुस्थितीत असलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींनीही एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, संगममाहुलीत कित्येक वर्षांपासून जीर्णाेद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराणी ताराराणींच्या समाधीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना पुरातत्व विभागाचे. इतिहासाच्या या पाऊलखुणांचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

ही तर सातारकरांची जबाबदारी..साताऱ्यातील संगममाहुली हे एक धार्मिक क्षेत्र असून, येथील पुरातन मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देतात. मात्र, आजमितीला हे सांस्कृतिक वैभव निस्तेज होऊ लागलेय, ते केवळ आपल्या अनास्थेपायी. या घाटावर राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या समाधी असून, इतिहास अभ्यासकांमुळे त्या हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे, ही सातारकरांचीच जबाबदारी आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच संगममाहुलीतील महाराणी येसूबाई यांच्या समाधीची पाहणी केली. यावेळी घाटावर असलेल्या राजघराण्यातील अन्य सदस्यांच्या समाधीची त्यांनी माहिती दिली. या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील. - सुहास राजेशिर्के, संस्थापक, महाराणी येसूबाई फाउंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर