शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महाबळेश्वरचा पारा १७ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST

महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच थंडीची तीव्रतादेखील हळूहळू वाढू ...

महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच थंडीची तीव्रतादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरू लागली आहे. सोमवारी हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान २४ तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी महाबळेश्वरात पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटक अधूनमधून भेट देत आहेत.

वर्ये पुलावर घाणीचे साम्राज्य

किडगाव : सातारा - वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वर्येसह परिसरातील अनेक ग्रामस्थ येता-जाता पुलाजवळ कचरा टाकून पुढे निघून जातात. कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून, वेण्णा नदीपात्राचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने या परिसराची तातडीने स्वच्छता करावी तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

सातारा शहरात स्वच्छता मोहीम

सातारा : डेंग्यू, मलेरिया तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी जंतुनाशक औषध व फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी केली जात आहे. या व्यतिरिक्त पथकाने नाले व ओढे स्वच्छतेचे कामही हाती घेतले आहे. शहरातील सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ, मल्हारपेठ या भागात ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

अंबेनळी घाटातील कठड्यांची पडझड

महाबळेश्वर : महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावर असलेल्या अंबेनळी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच घाटातील रस्त्याचीही ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. त्यामुळे बांधकाम विभागाने संरक्षक कठड्यांसह रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.

सातारा पालिकेच्या कारवाईला ‘ब्रेक’

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.