शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

महाबळेश्वर, पाचगणीमधील वीज, पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ...

महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाबळेश्वर व पाचगणी येथे वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.

तौक्ते चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला मोठा फटका बसला होता. वादळामुळे वीज वितरण कंपनीचे कंबरडेच मोडले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते तर विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या होत्या. यामुळे वीजपुरवठ्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारपासून शहराचा वीजपुरवठा बंद पडला होता. गेले चार दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न वीज वितरण विभागाकडून करण्यात येत होते. महाबळेश्वर व पाचगणी शहरास जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद पडला होता. वीजपुरवठा एक-दोन दिवसांत सुरू होईल, या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची साधी दखलही न घेतल्याने शहरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.