शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाबळेश्वरला आता मधुचंद्राबरोबरच ‘मधु’पर्यटनही! देशातील पहिले मधाचे गाव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 07:43 IST

मांघरमध्ये मधुपर्यटन सुरू व्हावे, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या काही वर्षांपासून झटत आहे.

- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘महाराष्ट्राचे काश्मीर’ असा नावलौकिक असणाऱ्या महाबळेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तेथील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून राज्य सरकारने निवडले आहे. देशातील हे पहिलेच ‘मधाचे गाव’ ठरणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मधुचंद्रही आणि मधुपर्यटनही असा दुग्धशर्करा योग साधण्याची संधी नवथर जोडप्यांना मिळणार आहे. इतर पर्यटकांना स्ट्रॉबेरीबरोबरच एक मधाचे बोट चाखायला मिळेल.

 मांघरमध्ये मधुपर्यटन सुरू व्हावे, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या काही वर्षांपासून झटत आहे. या परिसराचा झालेला विकास पाहून विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. आता ती प्रत्यक्षात साकारत आहे. याबाबतची घोषणा लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत. मधाचे गाव ही संकल्पना केवळ मांघरपर्यंत सीमित नसून ती राज्यातील इतर जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. 

  असे आहे मांघर...मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलाेमीटर कड्याखाली वसले आहे. गावची लाेकसंख्या ४५० आहे. ८० टक्के लोक मधमाश्यापालन करतात. या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असून, वर्षभर राहणारा फुलोरा आहे. गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. गावात मधमाश्यांमुळे समृद्धी आली आहे. गावात सामूहिक मधमाश्यांचे संगोपन केले जात आहे.

मध संचालनालयn मधमाश्यांचा विकास व विस्तार व्हावा, या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना महाबळेश्वरला करण्यात आली आहे. n मधमाश्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी, यासाठी संचालनालय झटत आहे

मधाचे गाव संकल्पना केवळ मांघरपर्यत सिमीत नसून इतर जिल्ह्यात राबविली जाणार आहे. मधमाश्यांच्या परपरागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात वाढ होते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. - बिपिन जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान