शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:10 IST

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची लिम्का बुकला दखल घ्यावी लागली आहे.सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असलेले खासदार शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि विधिमंडळ अशी राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. दुसरीकडे आसले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सलग ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे.ग्रामपंचायत सदस्य होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा सहकारी बोर्डात जिल्हास्तरावर सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी ते पहिल्यांदा १९६२ मध्ये आसले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर गावचे पहिले सरपंच म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी सलग दहा वर्षे सरपंच व नंतर आरक्षणामुळे दोन पंचवार्षिक कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम केले आहे.त्यांच्या कारकिर्दीत गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, कृषी क्षेत्रात अनेक विकासकामे केली. गावाला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते निवडून आले असून, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून, त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांचाउत्साह आणि काम करण्याचीतयारी पाहून आजही गावच्या तरुणांना त्यांचा हेवा वाटत असतो. त्यांच्या या कामाची लिम्का बुकने २०१२ मध्ये देशातील ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी आणि सलग कारकिर्द केल्याची नोंद घेतली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या कामाची दखल घ्यावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.शासन दप्तरी नोंदीअभावी वंचितअनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाºया माधवराव निगडेंच्या विक्रमाची शासनपातळीवर कुठेही नोंद नाही. काही वर्षांपूर्वी पंचायत राज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यावेळी ज्यांनी २५ वर्षे किंवा जास्त वर्षे कारकिर्द पूर्ण केलेल्या लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनास जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे, हेच माहिती नव्हते.सहकारी चळवळीतही योगदानग्रामपंचातीत काम करत असताना वाई तालुक्यातील सहकारी संस्था उभारण्यात योगदान दिले आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई तालुका सूतगिरणी स्थापनेपासून शेअर गोळा करण्यापासून उभारणीपर्यंत सभासद म्हणून काम करत आहेत.