शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:10 IST

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची लिम्का बुकला दखल घ्यावी लागली आहे.सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असलेले खासदार शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि विधिमंडळ अशी राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. दुसरीकडे आसले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सलग ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे.ग्रामपंचायत सदस्य होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा सहकारी बोर्डात जिल्हास्तरावर सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी ते पहिल्यांदा १९६२ मध्ये आसले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर गावचे पहिले सरपंच म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी सलग दहा वर्षे सरपंच व नंतर आरक्षणामुळे दोन पंचवार्षिक कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम केले आहे.त्यांच्या कारकिर्दीत गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, कृषी क्षेत्रात अनेक विकासकामे केली. गावाला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते निवडून आले असून, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून, त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांचाउत्साह आणि काम करण्याचीतयारी पाहून आजही गावच्या तरुणांना त्यांचा हेवा वाटत असतो. त्यांच्या या कामाची लिम्का बुकने २०१२ मध्ये देशातील ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी आणि सलग कारकिर्द केल्याची नोंद घेतली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या कामाची दखल घ्यावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.शासन दप्तरी नोंदीअभावी वंचितअनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाºया माधवराव निगडेंच्या विक्रमाची शासनपातळीवर कुठेही नोंद नाही. काही वर्षांपूर्वी पंचायत राज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यावेळी ज्यांनी २५ वर्षे किंवा जास्त वर्षे कारकिर्द पूर्ण केलेल्या लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनास जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे, हेच माहिती नव्हते.सहकारी चळवळीतही योगदानग्रामपंचातीत काम करत असताना वाई तालुक्यातील सहकारी संस्था उभारण्यात योगदान दिले आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई तालुका सूतगिरणी स्थापनेपासून शेअर गोळा करण्यापासून उभारणीपर्यंत सभासद म्हणून काम करत आहेत.