शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

दहिवडी : माण तालुक्यावर यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी ...

दहिवडी : माण तालुक्यावर यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. त्यामुळे यंदा माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर आहे.

माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत.

दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आंधळी धरणात आहे. आंधळी धरणावरील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही इतका मुबलक पाणीसाठा आहे. आंधळी धरण ५६, पिंगळी तलाव ६७ व राणंद मध्यम प्रकल्पात ६० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पात ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर माण तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू लागत होते. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा एकही प्रस्ताव माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात आहे.

माण तालुक्यात पाणी फौंडेशनच्या कामांचा मोठा फायदा

माण तालुक्यात सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा आणि पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गावागावात श्रमदानाचे तुफान आले होते. दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत ग्रामस्थ अगदी अबालवृद्धांसह एकजुटीने कामाला लागले होते.गावागावात श्रमपंढरी फुलली अन मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम झाली.

चाैकट : विहिरींना चांगले पाणी...

अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी शिवार हिरवा नेसून थटून गेला होता. राणंद, जाशी, ढाकण, लोधवडे प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा राणंद तलावातून राणंद, जाशी, पळशी, गोंदवले खुर्द, ढाकणी तलावातून ढाकणी, गटेवाडी, दिडवाघवाडी तर लोधवडे तलावातून फक्त लोधवडे गावासाठी शेती सिंचनासाठी पाण्याचे एक आवर्तन करण्यात आले आहे. मात्र, आंधळी धरणाच्या परिसरातील विहिरींना चांगले पाणी असल्याने धरणातील पाण्याला शेतकऱ्यांकडून

आतापर्यंत मागणी आली नाही.