शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

दहिवडी : माण तालुक्यावर यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी ...

दहिवडी : माण तालुक्यावर यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. त्यामुळे यंदा माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर आहे.

माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत.

दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आंधळी धरणात आहे. आंधळी धरणावरील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही इतका मुबलक पाणीसाठा आहे. आंधळी धरण ५६, पिंगळी तलाव ६७ व राणंद मध्यम प्रकल्पात ६० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पात ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर माण तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू लागत होते. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा एकही प्रस्ताव माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात आहे.

माण तालुक्यात पाणी फौंडेशनच्या कामांचा मोठा फायदा

माण तालुक्यात सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा आणि पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गावागावात श्रमदानाचे तुफान आले होते. दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत ग्रामस्थ अगदी अबालवृद्धांसह एकजुटीने कामाला लागले होते.गावागावात श्रमपंढरी फुलली अन मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम झाली.

चाैकट : विहिरींना चांगले पाणी...

अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी शिवार हिरवा नेसून थटून गेला होता. राणंद, जाशी, ढाकण, लोधवडे प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा राणंद तलावातून राणंद, जाशी, पळशी, गोंदवले खुर्द, ढाकणी तलावातून ढाकणी, गटेवाडी, दिडवाघवाडी तर लोधवडे तलावातून फक्त लोधवडे गावासाठी शेती सिंचनासाठी पाण्याचे एक आवर्तन करण्यात आले आहे. मात्र, आंधळी धरणाच्या परिसरातील विहिरींना चांगले पाणी असल्याने धरणातील पाण्याला शेतकऱ्यांकडून

आतापर्यंत मागणी आली नाही.