शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाची भाषा.. रस्ता, भिंत अन् झाडावरही!

By admin | Updated: July 2, 2015 21:45 IST

प्रेमिकांचे अफलातून प्रकार : ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान

कोंडवे : प्रेमीकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतेही माध्यम चालते. पण हे माध्यम जर सार्वजनिक ठिकाणच्या सौंदर्याचे हरण करणारे असेल तर त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे आपल्या प्रेमाचे आणि प्रेमींचे नाव कोरले जावू लागले तर त्यावर आळा आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक सातारा शहरात तरूणाईला मनसोक्त फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. येथे आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर वेळ घालविताना अनेकांना आता विकृती सुचू लागली आहे. पूर्वी कॉलेजच्या बाकांवर असणारी नावाची आद्याक्षरे आता चक्क ऐतिहासिक स्थळांवर आणि वास्तुंवर बघायला मिळू लागले आहेत. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीलाही या विकृतांनी सोडले नाही. कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ भिंतीवर नाव यावे म्हणून पेंट क ॅन च्या सहाय्याने टप्प्या टप्प्यावर नाव आणि आद्याक्षरे लिहिण्यात आले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. सार्वजनिक मालमत्तेवर केलेली ही जाहिरात अनेकांनी पाहिली पण त्यावर आक्षेप कोणीच नोंदविला नाही. वास्तविक ज्या ज्या वेळी असे कोणी करत असेल तर त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला पाहिजे. सार्वजनिक मालमत्ता जतन करण्याची ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते व्यक्त होणे ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. जेव्हा त्यांना व्यक्त व्हायला मर्यादा येतात. तेव्हा ते अन्य काही माध्यमांचा शोध घेतात. हा माध्यमांचा शोध घेताना त्यांना कशाचेच भान राहत नाही. म्हणूनच ऐतिहासिक वास्तु, भिंती आणि वृक्षांचे बुंदे हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम होते. (वार्ताहर) सातारा जिल्ह्याचे राजकारण तसे संवेदनशील आहे. काहीही झाले तरी परस्परांच्या हद्दीत हस्तक्षेप झालेला येथे कोणालाच आवडत नाही. आखून दिलेल्या मतदार संघात प्रत्येकजण अधिराज्य गाजवत असतो. समजा त्यात कोणी मध्ये घुसखोरी केली तर जे काही घमासान सुरू होते, ते केवळ अवर्णनीय असेच असते. पण ऐतिहासिक चार भिंतीवर म्हसवे आणि जावली हे शब्द लिहून त्याखाली हृदय काढण्यात येत आहे. अनेकांना कदाचित ही राजकीय चाल वाटली असेल. पण येथे कायम येणाऱ्या आणि भिंतीवर अशा रेघोट्या मारणाऱ्या एका युवकाने याचे विश्लेषण उत्तम प्रकारे केले आहे. म्हसवे गावातील मुलगी आणि जावली गावातील मुलगा यांचे प्रेमसंबंध असावेत, त्यामुळे प्रेमींची नावे लिहिण्यापेक्षा त्यांनी गावांची नावे लिहून या दोघांचे प्रेमाचे नाते अधोरेखित केले आहे. झाडाच्या बुंद्यालाही टोचण शहर व परिसरात प्रेमीकांना बसण्यासाठी काही रिक्त परिसर आहे. शहरापासून आणि महाविद्यालयापासून जवळ असणाऱ्या अजिंक्यतारा परिसरात प्रेमी युगूल मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. रखरखत्या उन्हात उघड्यावर फिरायला जाताना त्यांना झाडाची सावली महत्वाची वाटते. झाडाच्या सावलीत बसून आपले प्रेम फुलविणाऱ्या या प्रेमीकांनी या झाडाच्या बुंद्यालाच टोचणी दिली आहे. अजिंक्यताऱ्याबरोबरच जिल्हा परिषद मैदानावरही संध्याकाळी युगुलांची बैठक असते. त्यावेळीही परस्परांवरील प्रेम प्रदर्शित करण्यासाठी आपल्या नावांचे आद्याक्षर झाडावर कोरल्याचे पहायला मिळत आहे. अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळाई देवीच्या मंदिराला झाडांचा असा वेढा आहे. उन्हाळा पावसाळा येणाऱ्या प्रत्येकाला सावली देणाऱ्या या वृक्षाच्या बुंद्याला असे टोचण्यात आले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या युगुलांनी कोणतीच जागा शिल्लक ठेवली नाही. चक्क पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपवरही त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.