शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

हिरवा डोंगर पाहून मेंढ्याही खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:53 IST

सातारा : वाळलेलं गवत... काही दिवसांनंतर विघ्नसंतोषी मंडळींनी लावलेले वणवे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच डोंगर ओसाड झाले होते. जनावरांना ...

सातारा : वाळलेलं गवत... काही दिवसांनंतर विघ्नसंतोषी मंडळींनी लावलेले वणवे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच डोंगर ओसाड झाले होते. जनावरांना चारा मिळत नव्हता. सातारा परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाच्या सरी कोसळल्या अन् डोंगरांनी हिरवा शालू पांघरली. हिरवं गवत पाहून मेंढ्यांची पावलंही डोंगराच्या दिशेने धावू लागली आहेत.सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. परंतु या तालुक्यांमध्येच वरुणराजाही नेहमी पाठ फिरवतो. यंदाही या चार तालुक्यांमध्येही चांगलाच दुष्काळ अनुभवास मिळाला. जनावरांना चारा मिळेना. पिण्यासाठी पाणी मिळेना म्हणून मोठी जनावरं घेऊन शेतकरी चारा छावणीत गेले; पण शेळ्या, मेंढ्यांच्या पोटाची सोय झालीच नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुतांश मेंढपाळांनी स्थलांतर केले होते. काहीजण मराठवाड्यात तर काही मेंढपाळांनी कोकणाचा रस्ता धरला होता.सातारा जिल्ह्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे. ही वार्ता समजल्यानंतर मेंढपाळ कोकणातून गावाकडे परतायला लागले आहेत. त्यामुळे ते सध्या सातारा शहर परिसरातून मार्गक्रमण करत आहेत. याच रस्त्यात यवतेश्वर, सज्जनगड, अजिंक्यतारा डोंगरावर पावसामुळे हिरवे गवत उगवायला सुरुवात झाली आहे. गवत अद्याप मोठे झालेले नसले तरी डोंगररांगा हिरव्या दिसत आहेत. त्यामुळे शेळ्या, मेंढ्यांना गवत आकर्षित करत आहे.कित्येक महिन्यांपासून ते वाळलेले गवत, शेंगा, गवताच्या काड्या खाऊन भूक भागविली आहे. या जनावरांना सातारा परिसरातील डोंगर पाहिल्यानंतर मेजवाणी मिंळत असल्याचा आनंद होत आहे. त्यामुळेच साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरील डोंगरात गवत खाण्यासाठी मेंढ्या पळत आहेत. हिरव्या डोंगरावर चरणाºया मेंढ्या पाहिल्यानंतर माणसांचे मनही भरून येते.