शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 सातारा मतदार संघात ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:11 IST

सातारा : लोकसभेच्या सातारा मतदार संघासाठी मंगळवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा ४ टक्क्यांनी मतांची वाढ ...

सातारा : लोकसभेच्या सातारा मतदार संघासाठी मंगळवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा ४ टक्क्यांनी मतांची वाढ झाली आहे. या मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यासह एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले. अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सातारा मतदार संघामध्ये मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्या, त्यामुळे मतदानासाठी सायंकाळी अर्धा ते एक तासापर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. या मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास कडक ऊन असतानाही नागरिकांनी मतदान केले. ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदारांची संख्या वाढत गेली.सातारा मतदार संघात १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार आहेत. त्यापैकी सरासरी ५८ टक्के मतदारांनी हक्क बजावला. मागील निवडणुकीत ५६.७८ टक्के मतदान झाले होते. त्यात यंदाच्या निवडणुकीत थोडीफार वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (शिवसेना), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर (अपक्ष), आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), सागर भिसे (अपक्ष), अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले.जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या. सातारा तालुक्यातील नागेवाडी, नागठाणे. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव. कºहाड तालुक्यातील कालगाव, उंब्रज. जावळी तालुक्यातील जवळवाडी. खंडाळा तालुक्यातील लोणंद. खटाव तालुक्यातील जायगाव.फलटण तालुक्यातील सासवड, तसेच वाई तालुक्यातील काही गावांत मतदान प्रक्रिया सुरू होती. तेव्हा मशीनमध्ये बिघाड झाल्याने तासन्तास मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. अनेक मतदार तेव्हा रांगेत उभे होते. काहीजण परत येतो, असे म्हणून माघारीही निघून गेले. ज्या ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाला, त्या ठिकाणी निवडणूक विभागाने मतदानासाठी वेळ वाढवून दिली होती. मतदान मशीनच्या बिघाडामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण आलेला पाहायला मिळाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक