शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

चला एकत्रितपणे त्यांचा अधिवास सुरक्षित करू-वणवामुक्तीसाठी सातारकरांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:30 IST

सातारकर संवेदनशील आहेत. ‘लोकमत’ने केलेले आवाहन आणि वनविभागाच्यावतीने केलेल्या जनजागृतीमुळे अनेक हात वणवामुक्तीसाठी पुढे सरसावले आहेत. - डॉ. भारतसिंग हाडा, उपवनसंरक्षक अधिकारी

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

प्रगती जाधव-पाटील।सातारा : केवळ गंमत म्हणून किंवा चुकीच्या समजुतीमुळे लोक वणवा लावतात. या गमतीचा बराच दुरोगामी परिणाम वनांवर आणि पर्यायाने निसर्गावर होत असल्याचे ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांत मांडले. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ आणि सातारा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वणवामुक्तीसाठी श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रश्न : वणवामुक्तीचा परिणाम कुठंपर्यंत दिसणार आहे?उत्तर : सातारा जिल्ह्यात समृद्ध डोंगररांगा आहेत. या रांगा दरवर्षी वणव्याच्या आगीत होरपळत असतात. याने होणाऱ्या पर्यावरणीय हानीची गिनती कशातच होऊ शकत नाही. जिल्ह्यातील प्रत्येकाने वणवा रोखण्यासाठी आपापल्या हद्दीत प्रयत्न केले तरीही हजारो हेक्टर पसरलेले डोंगर आणि त्यातील सजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचू शकते. वणवामुक्तीचा सातारकरांनी घेतलेला ध्यास आणि त्यातून वणवा रोखला गेला तर ते राज्यासाठी रोलमॉडेल ठरेल.

प्रश्न : वणवामुक्तीचा उपक्रम कसा सुरू करण्यात येणार आहे?उत्तर : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण अनोखे संकल्प करतात. यंदा सातारकरांनी वणवामुक्तीचा संकल्प केला आहे. प्राथमिक स्तरावर अजिंक्यतारा आणि भैरोबाचा पायथा या दोन डोंगरांवर जाळरेषा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाचे दहा कर्मचारी आणि दहा स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. सलग पाच दिवस दोन तास

श्रमदान तर जाळरेषा काढणं सहज शक्य आहे.प्रश्न : जाळरेषा काढण्यासाठी नागरिकांनी सोबत काय आणावे?उत्तर : जाळरेषा काढण्यासाठी येणाºया नागरिकांना औजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वत:बरोबर पाण्याची बाटली आणि डोक्यावर टोपी या दोन बाबीच त्यांनी सोबत आणावी.

  • वन्यप्राण्यांचा रहिवासही सुरक्षित

वनवणव्यामुळे सर्वाधिक धोका पोहोचतो तो वन्यप्राण्यांना. सरपटणाºया प्राण्यांबरोबरच पक्षी आणि किडे मुंग्यांचाही होरपळून मृत्यू होतो. वणवे रोखण्यासाठी यंदा सामान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकांमध्ये या अनुषंगाने जनजागृती निर्माण केल्याने वणवा रोखणं शक्य आहे. त्या माध्यमातून वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहील, हे नक्की!

  • ग्रामस्थांची वणवामुक्तीसाठी शपथ

सातारा जिल्ह्यातील डोंगर पायथा परिसरात राहणाºया शेकडो गावांना तिथल्या वनरक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वणवामुक्तीची शपथ देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी वणवा लावणाºयांना प्रतिबंध करून वनांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. डोंगराच्या पायथ्याखाली राहणाºया प्रत्येक ग्रामस्थांचे यासाठी प्रबोधनही करण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थाचांही प्रतिसाद मिळतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग