शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मातंग समाजाच्या पाच टक्के स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:43 IST

कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा ...

कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा तसा बदल व प्रगती झालेली दिसून येत नाही. याबद्दल वारंवार आंदोलने झाली. तरीपण अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला म्हणावा तसा मिळालेला नाही. ही समाजाच्या दृष्टिकोनातून भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करता खूप गंभीर बाब आहे. यापुढे जर अनुसूचित जातीतील मातंग समाजाला असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करून जर स्वतंत्र पाच टक्के आरक्षण जातनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात अ ब क ड असे वर्गीकरण करून दिले गेले नाही, तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली राज्यभर टोकाचा लढा उभारू, असा गंभीर इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हणाले आहे की ,मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून नाजूक होती. त्यामुळे आरक्षणातील नोकरीचा लाभ मिळत असताना जे काही तोडपाण्याचे व्यवहार झाले ते समाजाला जमले नाहीत. त्यामुळे नोकरीतील आमचं आरक्षण थोरला आणि धाकटा भाऊ यांनीच घेतल्यामुळे मातंग समाज आहे त्याच अवस्थेत राहिला. शिवाय मातंग समाजातील ज्यांनी राजकारणात समाजाचा वापर करून सत्तेतील पदे भोगली त्यांनी समाजाच्या विकासापेक्षा स्वतःचं भलं करून घेण्यातच व राजकीय नेत्यांचे तळवे चाटण्यात धन्यता मानली.

आता मातंग समाज एकविसाव्या शतकामध्ये वावरतोय. समाजातील तरुणांना याची चांगली जाण आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी आम्ही समाजाचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रभर मातंग समाज आरक्षण प्रबोधन यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी पत्रकात सांगितले आहे.