शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मातंग समाजाच्या पाच टक्के स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:43 IST

कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा ...

कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा तसा बदल व प्रगती झालेली दिसून येत नाही. याबद्दल वारंवार आंदोलने झाली. तरीपण अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला म्हणावा तसा मिळालेला नाही. ही समाजाच्या दृष्टिकोनातून भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करता खूप गंभीर बाब आहे. यापुढे जर अनुसूचित जातीतील मातंग समाजाला असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करून जर स्वतंत्र पाच टक्के आरक्षण जातनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात अ ब क ड असे वर्गीकरण करून दिले गेले नाही, तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली राज्यभर टोकाचा लढा उभारू, असा गंभीर इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हणाले आहे की ,मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून नाजूक होती. त्यामुळे आरक्षणातील नोकरीचा लाभ मिळत असताना जे काही तोडपाण्याचे व्यवहार झाले ते समाजाला जमले नाहीत. त्यामुळे नोकरीतील आमचं आरक्षण थोरला आणि धाकटा भाऊ यांनीच घेतल्यामुळे मातंग समाज आहे त्याच अवस्थेत राहिला. शिवाय मातंग समाजातील ज्यांनी राजकारणात समाजाचा वापर करून सत्तेतील पदे भोगली त्यांनी समाजाच्या विकासापेक्षा स्वतःचं भलं करून घेण्यातच व राजकीय नेत्यांचे तळवे चाटण्यात धन्यता मानली.

आता मातंग समाज एकविसाव्या शतकामध्ये वावरतोय. समाजातील तरुणांना याची चांगली जाण आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी आम्ही समाजाचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रभर मातंग समाज आरक्षण प्रबोधन यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी पत्रकात सांगितले आहे.