शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गरजूंना मिळू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. तरीही काही गरजू आणि गरीब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यातील अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. तरीही काही गरजू आणि गरीब पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ देणे गरजेचे आहे. पात्र सधन लाभार्थ्यांपैकी ज्यांना सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल त्यांनी अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडावे. खऱ्या गरजू गरिबांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनास मदत करावी, असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.

तहसीलदार जमदाडे म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी खटाव तालुक्यातील उद्दिष्टपूर्ती झाली असली तरी काही हातगाडीवाले, कचरा वेचून उदरनिर्वाह करणारे, भूमिहीन, अल्पभूधारक, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, विधवा परित्यक्ता, हमाल अशा खरोखर गरीब आणि गरजूंना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात अन्नधान्य लाभ मिळविण्याकरता पात्र लाभार्थ्यांना योजनेची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दरात मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील दुबार नोंदणी, स्थलांतरित, मृत किंवा विवाहित मुली अशा लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी डॉक्टर, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊंंटंट आहेत, कोणी व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत असेल किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, बंगला आहे, कुटुंबात निवृत्ती वेतनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत, ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात ४४ हजारांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींनी या योजनेतून मोठ्या मनाने आणि स्वेच्छेने बाहेर पडावे. त्यासाठी स्वयंघोषणा पत्र रास्तभाव दुकानात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट

३१ जानेवारीपर्यंत आधार लिंक करून द्या

‘अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन आहेत. ज्या सदस्यांच्या नावापुढे आधार क्रमांक दिसत नाही अशा लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांक, मोबाईल नंबर रविवार ३१ जानेवारी पर्यंत लिंक करावेत, अन्यथा त्यांना फेब्रुवारीपासून धान्याचा लाभ मिळणार नाही,’ अशी माहिती तालुका पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे व पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे यांनी दिली.