शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड

By नितीन काळेल | Updated: March 16, 2024 13:12 IST

..तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिलीतर ‘रिपाइं’ला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हेही आम्हाला माहीत आहे, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्यासह ‘रिपाइं’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे युतीची महायुती झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यातही सत्ता प्राप्त झाली. लोकसभा निवडणुकीत सातारची जागा महायुतीतील ‘रिपाइं’ला देण्यात आली. पण, गद्दारी झाली. तरीही आम्ही शांत आहे. आता २०२४ ची निवडणूक असलीतरी आम्हाला महायुतीतून बाहेर पडल्यासारखे वाटत आहे. तसेच उमेदवारीत सातारच्या गादीचा तसेच ‘रिपाइं’चाही अपमान झालेला आहे. त्यामुळे मागे हटायचं नाही, तर नेटाने लढायचं असं ठरवलंय.तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे संबंधितांनी सुधारणा करावी. कारण, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची एक लाखतरी मते आहेत. ही मते मिळाली नाहीतर भाजप ४०० जागांचा आकडाही पार करणार नाही. प्रसंगी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा