शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड

By नितीन काळेल | Updated: March 16, 2024 13:12 IST

..तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिलीतर ‘रिपाइं’ला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हेही आम्हाला माहीत आहे, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्यासह ‘रिपाइं’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे युतीची महायुती झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यातही सत्ता प्राप्त झाली. लोकसभा निवडणुकीत सातारची जागा महायुतीतील ‘रिपाइं’ला देण्यात आली. पण, गद्दारी झाली. तरीही आम्ही शांत आहे. आता २०२४ ची निवडणूक असलीतरी आम्हाला महायुतीतून बाहेर पडल्यासारखे वाटत आहे. तसेच उमेदवारीत सातारच्या गादीचा तसेच ‘रिपाइं’चाही अपमान झालेला आहे. त्यामुळे मागे हटायचं नाही, तर नेटाने लढायचं असं ठरवलंय.तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे संबंधितांनी सुधारणा करावी. कारण, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची एक लाखतरी मते आहेत. ही मते मिळाली नाहीतर भाजप ४०० जागांचा आकडाही पार करणार नाही. प्रसंगी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा