शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

नेत्यांनो, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST

सातारा : ‘मराठा समाजातील लोकांना प्रत्येक ठिकाणी मानहानीला सामोरे जावे लागत आहे. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील लोकांना गुणवत्ता ...

सातारा : ‘मराठा समाजातील लोकांना प्रत्येक ठिकाणी मानहानीला सामोरे जावे लागत आहे. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील लोकांना गुणवत्ता असूनही शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवत असताना तसेच नोकऱ्या मिळवताना आणि पदोन्नती होताना मानहानी सोसावी लागते. राजकारणाचं गजकर्ण झाले, आज तुम्ही आमदार-खासदार आहात. पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहात? मराठा समाजातील लोकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,’असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले फाउंडेशनचे चेअरमन नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, ‘प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात मराठा समाज आहे. या समाजाबद्दल संबंधित आमदारांना काहीच वाटत नाही का. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली असताना महाराष्ट्र सरकारचा वकील जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आणि होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहत नाही. चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश करत असताना व सरकारी नोकरी लागण्यापूर्वी गुणवत्ता तपासली जाते. तेव्हा आरक्षण असणारे लोक निम्मे मार्क्स असतील तरीदेखील मराठा समाजाला मला बाजूला ठेवून त्यांची निवड केली जाते. हा मराठा समाजावर अन्याय आहे. हा अन्याय अजून किती दिवस सुरू ठेवला जाणार आहे? आम्ही दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या, अशी मागणी करत नाही. आज मराठा समाजाकडे शेतजमीन राहिलेली नाही. गावात मजुरीवर जाण्याची वेळ अनेक लोकांवर आलेली आहे. नेतेमंडळींनी आरक्षणाच्या प्रश्नावर पक्ष बाजूला ठेवून निर्णय घ्यावा. पुढची पिढी आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे.’

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘आरक्षणामध्ये राजकारण केले जाऊ नये. मराठा समाजाने आता एकत्र येणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत; पण आता राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लढणं गरजेचं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले प्रयत्न विसरून चालणार नाहीत.’

राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त केलं ते अपेक्षितच होतं; त्यामुळेच अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या अडचणी सोडविण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊन उद्योग-व्यवसायात देदीप्यमान कामगिरी केलेल्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.

तिन्ही राजेंनी सरकारला दणका द्यावा

मराठा समाज राजकारणात गुंतलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये गुंतलेले नेते मराठा समाजाच्या हितासाठी लढत नाहीत. सत्ता काही आयुष्यभर टिकत नसते, सरकार बदलत राहतात. आता उदयनराजे, संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या तिन्ही तिघांनी मिळून सरकारला आरक्षण प्रश्नावर धक्का द्यावा, अशी इच्छा नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

पाटील म्हणाले... उदयनराजे यांचा विजय असो!

लोकसभेची निवडणूक काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेले उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील हे मराठा समाजाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. उदयनराजे यांचे भाषण सुरू होणार होतं, तेवढ्यात नरेंद्र पाटील यांनी ‘उदयनराजे यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. त्याच वेळी शिवेंद्रसिंहराजेदेखील व्यासपीठावर उभे होते. कुणीच कायमचा शत्रू नसतो हेदेखील या निमित्ताने पाहायला मिळाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांचे संघटनदेखील होऊ लागलेले आहे.