शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

नेत्यांच्या दारी स्वर्ग... शहरात मात्र नरक !

By admin | Updated: December 11, 2015 00:48 IST

पालिकेची यंत्रणा नगरसेवकांच्या घरापुरतीच : कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईच्या तरतुदीची आवश्यकता--कचरा ‘कोंडी’

सातारा : कचरा... प्रत्येकजण याची जबाबदारी पालिका किंवा अन्य यंत्रणेवर ढकलून रिकामा होतो. काही चाणाक्ष लोकप्रतिनिधी शासनाची यंत्रणा राबवून आपले अंगण स्वच्छ करून घेतात. पण ज्यांच्या घराशेजारी लोकप्रतिनिधी राहत नाहीत, त्यांच्या घरापुढे कचऱ्याचा नरक आहे!सातारा शहरात कचरा उचलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वॉर्डनिहाय घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. घंटागाडी अवेळी येणं किंवा कमी वेळेसाठी थांबणे यामुळे अनेकदा चार दिवसांचा कचरा साठवून ठेवावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील काही मोजक्या आणि वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे.ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात शिकलेले आणि व्यवहारज्ञान असणारी माणसं राहतात, असा एक समज आहे. पण कचराकुंडीच्या वापरात हा समज सातारकरांनी धुळीस मिळविला आहे. कचराकुंडीपासून फुटभर अंतरावर विखुरलेला केर बरेच काही सांगून जातो. कुंडीत टाकायला आणलेला केर कुंडीबाहेर टाकून सातारकरांना काय मिळते माहीत नाही, पण साताऱ्यात पाहुणे म्हणून येणाऱ्या अनेकांनी या अस्वच्छतेकडे सातारकरांचे गबाळेपण म्हणून अंगुलीनिर्देश केला आहे.बहुतांश घंटागाडी भल्या पहाटेच येऊन जातात. त्यावेळी गृहिणी पाणी किंवा मुलांच्या शाळेच्या तयारीत असतात. त्यामुळे घंटागाडी कितीही वाजवत राहिली तरी गृहिणीला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. नोकरदार महिला स्वत:ची गाडी असेल तर आॅफिसला जाता-जाता हा केर कचरा कुंडीत टाकते. काहीवेळा पतीच्या मागे बसून नेम धरून कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अन्यत्र पडतो. आपला कचरा आपणच कचरा कुंडीत टाकण्याची सवय प्रत्येकाने लावली तर शहरातील हे विद्रुपीकरण बंद होईल. सातारकरांनी आपल्या घरासारखीच शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर अनेक प्रश्न प्रबोधनाशिवायही मिटून जातील यात शंका नाही. (प्रतिनिधी)कुंडीत भरतंय वासराचं पोट..सातारकरांना अद्यापही कचरा कुंडीत कसा टाकायचा याचे प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे पाहायला मिळते. कचरा कुंडी ऐवजी मोठ्या प्रमाणावर कचरा कुंडीच्या आजूबाजूला पसरलेला असतो. कित्येकदा काही अतिशहाणे गाडीवरूनच केराची पिशवी भिरकवतात आणि मग या घाणीत अधिक भर पडत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.स्वच्छतेसाठी बॅनर लावूनही गाढवपणा !वारंवार सांगूनदेखील नेहमीच्याच सोयीने भरचौकात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी काही जणांंनी शक्कल लढवून गाढवाच्या फलकाचा वापर केला आहे. ‘होय मी गाढवच आहे. मी येथेच कचरा टाकणार’ असा मजकूर लिहिलेला फलक असूनही कचरा टाकणे याठिकाणी बंद झालेले नाही. त्यामुळे कचरा टाकणारे गाढवच ठरले आहेत, असे यातून स्पष्टपणे सूचित होत आहे. ‘घंटा’पेक्षा कुंडी बरी...स्वच्छ व सुंदर सातारा साकारण्यासाठी शहरातील कचरा निर्मूलन ही एक महत्त्वाची बाब आहे. यासाठी पालिकेने सतत कचरा उचलण्यासाठी अगदी कुंडीपासून घंटागाडीचा वापर करून विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीदेखील सदरबझार येथील हिरवाईजवळ वर्षांनुवर्षांपासून जीर्ण झालेल्या कुंडीतच नागरिक कचरा टाकत आहेत. कुंडीपेक्षा कचरा अधिक असल्याने हा कचरा दिवसभर परिसरात विखुरलेला असतो. घंटागाडीची वेळ निश्चित नसल्याने घंटागाडीपेक्षा जीर्ण झालेल्या कुंडीचाच वापर नागरिकांना अधिक योग्य वाटतो.