शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

बिगडे काम सवाँरनेवाला नेता - आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:22 IST

राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य, परळी गट अनेक अडचणींवर मात करत... परिस्थितीशी दोनहात करत कधीही हार न मानलेला ...

राजू भोसले,

माजी जिल्हा परिषद सदस्य, परळी गट

अनेक अडचणींवर मात करत... परिस्थितीशी दोनहात करत कधीही हार न मानलेला आणि बंद पडत असलेल्या कामांना आपल्या चांगुलपणाच्या शिदोरीवर विरोधी पक्षात राहून देखील सत्ताधारी पक्षाप्रमाणे कामे पूर्ण करून घेणारा नेता म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ओळख. कास धरणाचे बंद पडलेले काम असो, मेडिकल कॉलेजचे रेंगाळलेले काम असो किंवा अगदी हद्दवाढीचा प्रश्न असो; सर्व कामे धसास लावणाऱ्या आणि कोणालाही न दुखावता जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या कर्तबगार नेत्याचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने....

मित्रांच्या दुनियेतील जीवलग, गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले सातारा आणि जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. ते कोणत्याही पक्षात असोत, लोकांना त्यांची कधीच भ्रांत नसते. आपला माणूस आणि आपल्या माणसांसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांनी अनेकांना आपल्या जवळ खेचून आणले आणि आपलेसे केले. त्यामुळे केवळ मतदारसंघातच नाही, तर जिल्ह्यात आणि राज्याच्या पटलावरही आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून तेवढ्याच पुण्याईवर न थांबता, स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे काम शिवेंद्रराजेंनी केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे, अशा आग्रहाने त्यांच्याशी बोलणारा आणि प्रत्येकाशी स्वतंत्र ओळख असलेला नेता मिळणे दुरापास्तच. आतापर्यंत शिवेंद्रराजेंनी स्वत:चा कधीच विचार केला नाही. लोकांची कामे कशी मार्गी लागतील, एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी लोक कधीच त्यांच्यापासून लांब गेले नाहीत. त्यांनीही कधी लोकांना अंतर दिले नाही. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीमध्ये धावून जाण्याची त्यांची पद्धत आहे. प्रत्येकाच्या सुखात आणि दु:खामध्ये सर्वांनाच त्यांचा आधार वाटत आलेला आहे.

सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना जोडले आहे. नवीन उद्योग सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. एमआयडीसी अडचणीत असताना त्याला उभारी कशी मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. राहुल बजाज यांच्याशी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना साताऱ्यातील युनिट सुरू करण्याची कायम विनंती केली. त्याबरोबरच बंद पडणाऱ्या अनेक कंपन्या त्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून कशा सुरू करता येतील, यासाठी प्राधान्य दिले. त्यानिमित्ताने लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, यासाठी कायम बाबा प्रयत्नशील राहिले.

हद्दवाढीचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी सोडविलाच होता. पण, सरकार बदलले आणि त्याला इतरांनी वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. पण, बाबांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून, तर कधी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहराच्या जवळचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. हद्दवाढ झाली, ती केवळ शिवेंद्रसिंहराजेंच्यामुळेच झाली. त्याबाबत इतर कोणीही कितीही दावा केला तरी, त्यांचे प्रयत्न आणि त्यासाठीचे सातत्य दुर्लक्षित करता येणार नाही. या हद्दवाढीचा आपल्याला किती फायदा होईल, हा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला देखील नाही. पण, सातारा शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे, हेच ध्येय ठेवून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळेच ते कोणत्याही पक्षात असले तरी कार्यकर्त्यांना फरक पडत नाही.

कास धरणाचे काम पुन्हा सुरू झाले, ते शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नाने. धरणाच्या कामाला निधी कमी पडत असल्याने काम निम्म्यावर थांबविण्यात आले होते. लोकांची अलीकडे येणे आणि पलीकडे जाण्याचीही अडचण होऊ लागली होती. अशा परिस्थितीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत ठाण मांडले. वाढीव निधीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर कासला वाढीव निधी खेचून आणला. त्यामुळेच कासची पाणी क्षमता वाढविण्याचे काम पुन्हा सुरू झाले. याचे श्रेय कोणीही घेतले तरी, बाबाराजेंनी केलेले प्रयत्न कोणालाच दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे अशी बंद पडणारी आणि अडचणीत असलेली कामे त्यांनी मार्गी लावली.

मेडिकल कॉलेजचे काम तर अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. जमीन हस्तांतरणापासून अनेक अडचणी येत होत्या. बाबाराजेंना त्याचे श्रेय मिळू नये यासाठी अनेक नेते प्रयत्नशील होते. त्यांनी तसे उद्योग देखील केले आणि आपल्या नावावर मेडिकल कॉलेज आणल्याचे श्रेय मिळविण्यासाठी प्रयत्न केला. शिवेंद्रसिंहराजेंनी कोणताच गाजावाजा केला नाही. पण, अजित पवार यांच्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध याठिकाणी कामाला आले. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आलेले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी मेडिकल कॉलेज ताबडतोब सुरू करत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता शासकीय निवासस्थानी जयंत पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत कृष्णा खोऱ्याकडून जमीन हस्तांतरणाचे काम झाले. ही राजकीय इच्छाशक्ती आणि काम करून घेण्याची बाबांची हातोटी सहज कोणालाच जमणार नाही. अखेर सध्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातच मेडिकल कॉलेज सुरू करायचे आणि इमारत बांधकामानंतर ते नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले.

एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते बाबाराजेंचा जीवलग मित्र अशी माझी झालेली ओळख ही देखील बाबाराजेंची कर्तृत्ववान कार्यशैली आणि आपलेपणाच्या भावनेमुळे झाली आहे. सतत त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे लोक आणि कार्यकर्त्यांना जपण्याचे प्रयत्न सुरू असतात. सर्वांना एकत्र करून ती ताकद बाबांच्या मागे उभी करण्याचेच काम आम्ही अनेक वर्षे करत आहोत, यापुढेही करत राहू... त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची साथ अशीच अखंड राहो, ही अपेक्षा......