शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

साताºयात ६७०० भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:24 IST

सतर्कतेचे आवाहन : घरमालकांकडून पोलीस ठाण्यात यादी सादरलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अलीकडे नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने साताºयात तात्पुरते वास्तव्यास येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, जवळपास ६,७०० कुटुंबं भाड्याने राहत आहेत. घरमालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार हा आकडा आहे.दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी भाड्याने राहत असलेल्या लोकांची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात जमा ...

सतर्कतेचे आवाहन : घरमालकांकडून पोलीस ठाण्यात यादी सादरलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अलीकडे नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने साताºयात तात्पुरते वास्तव्यास येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, जवळपास ६,७०० कुटुंबं भाड्याने राहत आहेत. घरमालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार हा आकडा आहे.दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी भाड्याने राहत असलेल्या लोकांची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन घरमालकांना केले होते. गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहर आणि परिसरात भाड्याने राहणाºया कुटुंबांची माहिती पोलीस संकलित करत आहेत. भाड्याने घर घेऊन दहशतवादी कारवाया केल्याचे अनेकदा तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी त्यांचे फोटो, ओळखपत्र घेणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारच्या कारवाया केल्यानंतर संबंधित भाडेकरू रातोरात पळून जातात. घरमालकांनी त्यांचा पत्ता आणि फोटो घेतला नाही तर त्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. त्यामुळे हा सारा खटाटोप पोलिसांना करावा लागत आहे.पालिका म्हणते १४ हजार भाडेकरूसातारा शहरात ३६ हजार ४०० मिळकती आहेत. अनेक ठिकाणी बांधकामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे मिळकतींचा आकडा ४० हजारांच्या घरात आहे. पालिकेकडून ज्यावेळी घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला, त्यामध्ये जवळपास १४ हजार मिळकतीमध्ये भाडेकरू राहत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस ठाण्यात अद्यापही अनेकांनी भाडेकरूंची माहिती दिली नाही. परिणामी पोलिसांना वारंवार माहिती देण्याचे आवाहन करावे लागत आहे. सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याकडे आत्तापर्यंत ६ हजार ७०० कुटुंबे भाड्याने राहत असल्याची नोंद झाली आहे.तीन वर्षांत सातजणांवर गुन्हेगेल्या तीन वर्षांत भाडेकरूंची माहिती न देण्याºया सात घरमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. अद्यापही अनेकांकडून भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली गेली नाही. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.घरमालकांना भाडेकरूंची नोंदणी पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भाड्याने राहत असलेल्या लोकांची सविस्तर माहिती असावी यासाठी पोलिसांनी हे बंधन घातले आहे.