शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

स्वत:च्या शेतातच ‘शेवटची तयारी’-

By admin | Updated: August 28, 2014 22:21 IST

तळीये : महसूल विभागाने पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी

संजय कदम - वाठार स्टेशन --कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील तळिये गावास स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नसल्याने स्वत:च्या शेतातच अंत्यसंस्कार करावे लागतात. वर्षानुवर्षे हीच परंपरा गावात सुरू असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी होत आहे.स्मशानभूमीबाबत अनेकदा ग्रामसभेत ठराव होतात. मात्र ग्रामस्थांमध्ये एकमत होत नसल्यामुळे आजतागायत स्मशानभूमीचा प्रश्न खोळंबला आहे. ‘स्मशानभूमी नसलेले गाव’ अशी ओळख तयार झाली आहे. तर गावातच रस्त्याकडेला तीनशे स्क्वेअर फूट जागेत मुस्लिम समाजाची दफनभूमी असून ही जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे एकावर एक थर देण्याशिवाय दुसरा पर्यायच या समाजबांधवांना राहिला नाही. सुमारे एक हजार लोकसंख्येचे तळिये गाव आहे. हे गाव शेतीप्रधान असून कांदा, बटाटा उत्पादनात अग्रेसर आहे. गावच्या मध्यभागातून तळहिरा ओढा जात असल्याने याठिकाणी यापूर्वी दशक्रिया विधी केले जायचे. मात्र, लोकवस्ती असल्याने या ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यास ग्रामपंचायतीचा विरोध आहे.‘लोकमत’ने यापूर्वीच या स्मशानभूमीच्या जागेसाठी आवाज उठविल्यानंतर तत्कालीन सरपंच सत्यवान चव्हाण यांनी गावाशेजारील स्वत:ची जागा देण्याची भूमिका घेतली. परंतु, यास ग्रामस्थांनीच विरोध केल्याने तो प्रश्न प्रलंबित राहिला. तर १५ आॅगस्टला स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संदीप मुसळे यांनी चार गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला. परंतु यावर आता ग्रामस्थांतून उलटसुलट चर्चा होत असल्याने स्मशानभूमीचा प्रश्न जैसे थे आहे.तळिये गावासाठी गावातून जाणाऱ्या तळहिरा ओढ्यात गावच्या पश्चिम बाजूकडील जमीन स्मशानभूमीसाठी देण्याबाबत शासनाने पुढाकार घेऊन जागा निश्चित केली तरच हा प्रश्न सुटेल, अन्यथा हा प्रश्न कायमच प्रलंबित राहील.- विमल चव्हाण, सरपंचशासकीय किंवा महसूल विभागाच्या हद्दीतील ओढ्यातच स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून स्मशानभूमीचा अनेक वर्षांचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.- बाळासाहेब देशमुख, ग्रामस्थजमीनच नाही त्यांचे काय?ज्यांना शेतीवाडी आहे, त्यांनी आपल्याच शेतात अंत्यसंस्कार करावे, हा जरी नियम असला तरी ज्यांना जमीनच नाही त्यांची मात्र मोठी अडचण होत आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मोठ्या समस्येसाठी एकमुखी ठोस भूमिका घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.