शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील दुर्गम किल्ले मोजताहेत अखेरची घटका!

By admin | Updated: August 4, 2015 23:23 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : जागतिक वारसा जपतोय; पण ऐतिहासिक वारसा हरवतोय

धीरज कदम - कोयनानगर -अतिशय दुर्गम, डोंगराळ अशा कोयना परिसरातील पर्यटनस्थळांची परवड अद्यापही थांबलेली नाही. एकेकाळी शिवाजी महाराज व त्यांच्या सवंगड्यांनी काही काळ वास्तव केलेल्या येथील भैरवगड, प्रचितगड, जंगली, जयगड या किल्ल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागतिक वारसा हक्काच्या यादीत कोयना धरणाचा समावेश झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे, पण ऐतिहासीक वारसा हरवतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील जंगली जयगड येथे जाण्यासाठी फक्त चौथ्या टप्प्यापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे फक्त पायवाट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी येथे रस्ता व्हावा, अशी मागणी करुनही येथील वनविभाग प्रत्येक वेळी याकामी आडमुठी भूमिका घेत आहे. पर्यटन विभागानेही या ठिकाणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे इतकी पडझड झाली आहे की, याठिकाणी शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने पावन झालेला किल्ला होता असे जर एखाद्या नवख्या व्यक्तीला सांगितले तर विश्वासच बसणार नाही.हेळवाकच्या दक्षिणेस भैरवनगड नावाचा आणखी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचीही मोठी पडझड झाली आहे. येथे जाण्यासाठी हेळवाकपासून पातारपुंज गावापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे सर्व अंतर पायवाटेने जावे लागते. येथेही रस्ता व्हावा म्हणून येथील काही जमीनमालकांनी आपल्या जमिनी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही येथील वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे येथे रस्ता झालेला नाही. येथील भैरवनाथ मंदिरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते. तेथे सर्व भाविकांना चालत जावे लागते. हा परिसर घनदाट जंगल आणि दऱ्या-खोऱ्यांचा आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही सुविधा नाहीत. येथून जर एखाद्याचा पाय घसरला तर तो किमान दोन हजार फूट खोल दरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.प्रचितगड हा देखील पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक असाच आहे. येथे जाण्यासाठी हेळवाक ते तळोशीपर्यंत तीन किलोमीटर डांबरी रस्ता आहे. तेथून पुढे १५ ते १६ किलोमीटर पायवाटेने चालत जावे लागते. हा किल्ला डोंगर उतरावर असल्याने येथे सातारा जिल्ह्याच्या बाजूने जाताना तिव्र उतार आणि रत्नागिरीकडून येताना चढ चढून यावे लागते. येथे असणारी पायवाटही धोकादायक आहे. येथील सातगाव कमिटीने किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी, म्हणून वेळोवेळी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे निवेदने दिली आहेत. मात्र, अजून एकही मागणी मान्य झालेली नाही. पर्यटन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणाची दुरुस्ती करुन आपला ऐतिहासिक वारसा समृद्ध करावा, अशी मागणी होत आहे. भैरवगडावर अनेक ऐतिहासीक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची पडझड झाल्याने अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जबाबदार वनविभागच असून त्याच्या भूमिकेमुळे स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. - ईश्वरी जोशीपर्यटक, चिपळूण