शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

कोयनेतील दुर्गम किल्ले मोजताहेत अखेरची घटका!

By admin | Updated: August 4, 2015 23:23 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : जागतिक वारसा जपतोय; पण ऐतिहासिक वारसा हरवतोय

धीरज कदम - कोयनानगर -अतिशय दुर्गम, डोंगराळ अशा कोयना परिसरातील पर्यटनस्थळांची परवड अद्यापही थांबलेली नाही. एकेकाळी शिवाजी महाराज व त्यांच्या सवंगड्यांनी काही काळ वास्तव केलेल्या येथील भैरवगड, प्रचितगड, जंगली, जयगड या किल्ल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागतिक वारसा हक्काच्या यादीत कोयना धरणाचा समावेश झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे, पण ऐतिहासीक वारसा हरवतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील जंगली जयगड येथे जाण्यासाठी फक्त चौथ्या टप्प्यापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे फक्त पायवाट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी येथे रस्ता व्हावा, अशी मागणी करुनही येथील वनविभाग प्रत्येक वेळी याकामी आडमुठी भूमिका घेत आहे. पर्यटन विभागानेही या ठिकाणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे इतकी पडझड झाली आहे की, याठिकाणी शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने पावन झालेला किल्ला होता असे जर एखाद्या नवख्या व्यक्तीला सांगितले तर विश्वासच बसणार नाही.हेळवाकच्या दक्षिणेस भैरवनगड नावाचा आणखी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचीही मोठी पडझड झाली आहे. येथे जाण्यासाठी हेळवाकपासून पातारपुंज गावापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे सर्व अंतर पायवाटेने जावे लागते. येथेही रस्ता व्हावा म्हणून येथील काही जमीनमालकांनी आपल्या जमिनी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही येथील वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे येथे रस्ता झालेला नाही. येथील भैरवनाथ मंदिरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते. तेथे सर्व भाविकांना चालत जावे लागते. हा परिसर घनदाट जंगल आणि दऱ्या-खोऱ्यांचा आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही सुविधा नाहीत. येथून जर एखाद्याचा पाय घसरला तर तो किमान दोन हजार फूट खोल दरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.प्रचितगड हा देखील पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक असाच आहे. येथे जाण्यासाठी हेळवाक ते तळोशीपर्यंत तीन किलोमीटर डांबरी रस्ता आहे. तेथून पुढे १५ ते १६ किलोमीटर पायवाटेने चालत जावे लागते. हा किल्ला डोंगर उतरावर असल्याने येथे सातारा जिल्ह्याच्या बाजूने जाताना तिव्र उतार आणि रत्नागिरीकडून येताना चढ चढून यावे लागते. येथे असणारी पायवाटही धोकादायक आहे. येथील सातगाव कमिटीने किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी, म्हणून वेळोवेळी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे निवेदने दिली आहेत. मात्र, अजून एकही मागणी मान्य झालेली नाही. पर्यटन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणाची दुरुस्ती करुन आपला ऐतिहासिक वारसा समृद्ध करावा, अशी मागणी होत आहे. भैरवगडावर अनेक ऐतिहासीक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची पडझड झाल्याने अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जबाबदार वनविभागच असून त्याच्या भूमिकेमुळे स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. - ईश्वरी जोशीपर्यटक, चिपळूण