शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदर्कीचा बस थांबा मोजतोय अखेरची घटका

By admin | Updated: June 20, 2017 15:55 IST

भिंती धोकायदायक : पावसाळ्यात साचतेय पाणीच-पाणी

आॅनलाईन लोकमतआदर्की , दि. २0 : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आठवण जागविणारे आदर्की बुद्रुक येथील पिकअप शेड सध्या समस्यांचे आगार बनले आहे. उन्हाळा असो की पावसाळा येथील समस्या कायम असून यामुळे प्रवासी व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना आखावी, अशी मागणी होत आहे.फलटण-सातारा मार्गावर असलेले आदर्की बुद्रुक गाव पश्चीम भागातील महत्वाचे गाव आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी तब्बल ५० वर्षांपूर्वी पिकअप शेड उभारण्यात आले. तसेच पाहिले तर या पिकअप शेडला महत्व प्राप्त झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. त्याकाळी आदर्की बुद्रुक येथील बाबासाहेब धुमाळ यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण याठिकाणी आले होते. यावेळी फलटणवरून चिमणराव कदम येणार म्हणून यशवंतराव चव्हाण याच पिकअप शेडमध्ये त्यांची वाट पाहत बसले होते. या जुन्या आठवणी जागविणारे हे पिकअप शेड सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. पिकअप शेडची दुरवस्था झाली असून काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या पिकअप शेडमध्ये पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. आदर्की बुद्रुक येथे सर्व विभागाची कार्यालये व आठवडा बाजार भरत असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते.

उपाययोजनेची मागणी

पिकअप शेडच्या लाकडी खिडक्या तुटल्या आहेत. भिंतीही धोकादायक झाल्या आहेत. पिक-शेड समोरील रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे वाहत जाणारे पाणी शेडमध्ये येत आहे. त्यामुळे प्रवाशांना पिकअप शेडमध्ये बसता येत नाही. या पिकअप शेडची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.