शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पाणी पातळी खालावल्यानं जमिनी पडू लागल्या उघड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:40 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणी पातळी वेगाने खालावत चालली असून सद्यस्थितीला तलावात नऊ फुटाहून कमी ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणी पातळी वेगाने खालावत चालली असून सद्यस्थितीला तलावात नऊ फुटाहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात काही ठिकाणी उघड्या पडलेल्या जमिनीमुळे चोहोबाजूला पाणी व मधोमध जमिनीचा लांब असा काहीसा भाग उघडा दिसत असल्याने, कास तलावावर बेटाचे स्वरूप साकारल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या काही भागात कास तलावाद्वारे पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज होत असणारा पाणीपुरवठा व उष्णतेची तीव्रता वाढत जाऊन पाणी पातळी खालावत जाऊन साधारण जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडतो, तर मे महिन्यादरम्यान दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडून शहराचा पाणीपुरवठा तिसऱ्या व्हॉल्व्हवर येतो.

पावसाळ्यात साधारण जुलै महिन्याच्या आसपास मान्सूनच्या मुसळधार पावसात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून साधारण जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या सुरुवातीस सांडव्यावरून तीन ते चार फूट उंचीपर्यंत पाणी पडून वाहत असते. दरम्यान, सर्वत्र कास तलाव पाण्याने काठोकाठ भरलेला पाहायला मिळतो. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून हळूहळू पाणी पातळी खालावण्यास सुरुवात होते. साधारण एप्रिल महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी खालावून काही ठिकाणी तलावाच्या काठाच्या जमिनी उघड्या पडू लागतात. यावेळी कास तलावावर बेट साकारल्याचे चित्र दिसून येते. त्यानंतर आणखी काही दिवसांनी पाणी पातळी खालावून स्वीमिंग टँक साकारल्याचेही चित्र दिसून येते.

०५कास

फोटो कॅप्शन :

कास तलावाच्या पाणी पातळीत घट होत असल्याने काठाच्या जामिनी उघड्‌या पडू लागल्या असल्याने जणू काही कासवर बेटच साकारल्याचे चित्र दिसत आहे.

(छाया : सागर चव्हाण )