शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आंबेनळी घाटात दरड कोसळली, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:33 IST

वाहतूक विस्कळीत होणार 

सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्ण उघडीप असली तरी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असलेतरी पाच दिवस मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक विस्कळीत होणार असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग कोकणला जोडणारा आहे. या मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविली जात आहे. परिणामी पाच दिवस मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा करावा लागणार आहे. तसेच पश्चिमेकडीलच बुरडाणी, कोट्रोशी, दोडाणी, उचाट रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. पोकलेन आणि ब्लास्टिंगच्या सहाय्याने दरड हटविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. दरड हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी आणि कोयना खाेऱ्यात पाऊस थांबल्यातच जमा आहे. यामुळे अनेक दिवसानंतर पश्चिम भागातील लोकांनाही सूर्यदर्शन होऊ लागले आहे. तसेच शेतीची कामे आणि भात लागणीलाही वेग येणार आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे २१ आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे २ हजार १५५, नवजाला १ हजार ९४८ आणि महाबळेश्वरला २ हजार १३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागात पावसाची उघडीप असलीतरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असलीतरी साठा ७२.५१ टीएमसी झाला होता. सुमारे ६९ टक्के धरण भरले आहे. तर पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे.पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. तरीही धरणात पाण्याची आवक असल्याने साठा वाढू लागला आहे. तर सातारा शहरात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात सूर्यदर्शन सुरू झाले होते. त्यामुळे तीन आठवड्यानंतर सातारकर सततच्या पावसापासून दूर झाले आहेत.