शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

Satara: आंबेनळी घाटात दरड कोसळली, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:33 IST

वाहतूक विस्कळीत होणार 

सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्ण उघडीप असली तरी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असलेतरी पाच दिवस मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक विस्कळीत होणार असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग कोकणला जोडणारा आहे. या मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविली जात आहे. परिणामी पाच दिवस मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा करावा लागणार आहे. तसेच पश्चिमेकडीलच बुरडाणी, कोट्रोशी, दोडाणी, उचाट रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. पोकलेन आणि ब्लास्टिंगच्या सहाय्याने दरड हटविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. दरड हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी आणि कोयना खाेऱ्यात पाऊस थांबल्यातच जमा आहे. यामुळे अनेक दिवसानंतर पश्चिम भागातील लोकांनाही सूर्यदर्शन होऊ लागले आहे. तसेच शेतीची कामे आणि भात लागणीलाही वेग येणार आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे २१ आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे २ हजार १५५, नवजाला १ हजार ९४८ आणि महाबळेश्वरला २ हजार १३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागात पावसाची उघडीप असलीतरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असलीतरी साठा ७२.५१ टीएमसी झाला होता. सुमारे ६९ टक्के धरण भरले आहे. तर पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे.पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. तरीही धरणात पाण्याची आवक असल्याने साठा वाढू लागला आहे. तर सातारा शहरात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात सूर्यदर्शन सुरू झाले होते. त्यामुळे तीन आठवड्यानंतर सातारकर सततच्या पावसापासून दूर झाले आहेत.