शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:09 IST

दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.

ठळक मुद्देधरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बसलेल्या आंदोलक राहिले उपाशी

सातारा : दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या ३६ दिवसांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी झालेले धरणग्रस्त सोमवारी दिवसभर उपाशी राहिले. आमचे काय चुकले, असा विचारविनिमय सकाळपासूनच धरणग्रस्तांमध्ये सुरु होता. प्रशासनाच्या असहकार्याबद्दल निषेधही व्यक्त केला.धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आपले घर- दार, शेतीवाडी, जन्मभूमी पाण्यात बुडवली, आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न दाखविली. आमच्या त्यागातून दुष्काळी भागाला पाणी मिळेल, या उदात्त हेतूने कसदार जमिनी धरणासाठी दिल्या; परंतु पुनर्वसनाची प्रक्रिया दिवसेंदिवस लांबतच गेली. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी या योजना तयार केल्या नाहीत, त्यामुळे मूळ हेतूनलाच धक्का बसला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.जास्त पावसाच्या भागातून धरणग्रस्तांचे कमी पावसाच्या भागात पुनर्वसन करण्यात आले; परंतु अद्याप या धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर तयार केले नाही. जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडून कुठल्याच प्रश्नांची सोडवणूक होत नाही. यामुळे धरणग्रस्तांच्या मनात चिड आहे. ३६ दिवस सलग आंदोलन करुनही प्रशासन हालत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी आता काय करावे? याबाबत अस्वस्थता पसरली आहे. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रकाश भातुसे, आनंदा सपकाळ, व्यंकटराव पन्हाळकर, शंकरराव चव्हाण, मोहन धनवे यांनी मनोगत व्यक्त केले.आता आंदोलनाची तीव्रता वाढवणारआता आंदोलन अधिक तीव्र करुन प्रशासनाला जाग आणण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने धरणग्रस्तांचा अंत पाहू नये, असा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर