शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

‘भूमिअभिलेख’चा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

जत पोलिसांत गुन्हा दाखल : आठ हजारांची लाच घेतली

जत : येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक (उमेदवार) सुरेश शंकर साळुंखे (वय ४५, रा. जत, मूळ रा. गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सांगली यांनी आज (गुरुवार) रंगेहात पकडले. ही कारवाई सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान कार्यालयातच करण्यात आली. याप्रकरणी सुरेश साळुंखे यांच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.विजय शिवाजी माने (वय ३५, रा. कैकाडी गल्ली, शिवानुभव मंडपजवळ, जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात त्यांनी विनंती अर्ज केला होता. अनेकवेळा विनंती करून व हेलपाटे मारुनही त्यांचे हे काम झाले नव्हते. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून देण्यासाठी सुरेश साळुंखे यांनी विजय माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु हे काम कायदेशीर असून नियमित आहे, त्यामुळे मी दहा हजार रुपये देणार नाही. फक्त आठ हजार रुपये देतो, असे माने यांनी साळुंखे यांना सांगितले होते. यासंदर्भात माने यांनी लाचलुचपत सांगली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानुसार आज लाचलुचपत सांगली विभागाने सापळा लावून, सुरेश यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सुरेश साळुंखे याचे मूळ गाव गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ आहे. तीन वर्षापूर्वी तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुनील लाळे यांनी त्याला येथे दैनंदिन कामासाठी बोलावून आणले होते. त्यामुळे या कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांचे खासगी काम तो करीत होता. त्यामुळे सर्वांची मर्जी त्याने संपादन केली होती. या कार्यालयात साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा होता. कार्यालयातील कर्मचारी व दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी उध्दट वर्तन करणे, मन मानेल तसे पैसे मागून कामाची पूर्तता करणे, अन्यथा काम करण्यास नकार देणे यामुळे त्याच्याविरोधात सतत तक्रारी होत होत्या. लाचलुचपत विभागाने या कार्यालयातील फक्त उमेदवारावरच कारवाई केली आहे. परंतु मुख्य सूत्रधार नामानिराळे आहेत. त्यांच्यावरही यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)वारस नोंदीसाठी लाचेची मागणीविजय माने (शिवानुभव मंडपजवळ जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात सुरेश साळुंखे यांनी माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु माने यांनी आठ हजार रुपये देतो, असे सांगून साळुंखे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.४साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा४मुख्य सूत्रधार नामानिराळे असून, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.