शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना

By admin | Updated: November 15, 2015 01:03 IST

दाद मागूनही डोळेझाक

खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ आता बांधकाम व्यावसायिकांनी तालुक्यात झेप घेतली आहे. औद्योगिकीकरण व बांधकाम यामुळे होणाऱ्या जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. बिल्डरांनी जमिनीबरोबर ओढ्यांवर अतिक्रमण करीत सपाटीकरणाचा सपाटा लावल्याने पावसाळ्यात ओढ्यांचे पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही ते डोळेझाक करीत आहेत. खंडाळा तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावर कारखानदारी उभी राहत आहे. त्यामुळे कंपन्यांबरोबर कामगारांचीही संख्या वाढली आहे. साहजिकच बांधकाम व्यावसायिकांची नजर खंडाळ्याकडे वळली आहे. त्यासाठी बिल्डर लोकांनी ठिकठिकाणी जागा खरेदी करून व्यावसायिक दृष्टिकोनातून सपाटीकरण चालू ठेवले आहे. तालुक्यात डोंगर टेकड्यांच्या बाजूने असणारे नैसर्गिक ओढे बंद करून ते मुजवले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही, असे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीमालाचे लाखोंचे नुकसान होत आहे. मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नाही. खंडाळा तालुक्यात ठिकठिकाणी ओढ्यांवर नळ्या टाकून त्यावरून खासगी रस्ते बनवले गेले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण ओढेच नावाखाली नैसर्गिक समतोल ढासळला जात आहे. अधिकारीही तात्पुरती समज देऊन प्रकरण मिटवतात; मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे तालुक्यातील टेकड्या तर लुप्त झाल्याच आहेत. वृक्षतोडही भरपूर प्रमाणात झाली आहे. आता ओढेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार हा मोठा प्रश्न आहे. हळूहळू ओढ्यांचे आकार कमी होऊ लागलेत. त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. जमिनींना लाखोंच्या किमती येत असल्याने फुटाफुटाने जागा वाढविण्याचा परिणाम ओढ्यांवर होत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)  

माझ्या शेताजवळील ओढ्यावर अतिक्रमण करून जमीन सपाटीकरण केल्याने पावसाळ्यात पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण कांदा पीक पाण्यात वाहून गेले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, अद्याप कोणताही निर्णय कळविण्यात आला नाही. - शामराव निकम, हरळी