शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना

By admin | Updated: November 15, 2015 01:03 IST

दाद मागूनही डोळेझाक

खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ आता बांधकाम व्यावसायिकांनी तालुक्यात झेप घेतली आहे. औद्योगिकीकरण व बांधकाम यामुळे होणाऱ्या जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. बिल्डरांनी जमिनीबरोबर ओढ्यांवर अतिक्रमण करीत सपाटीकरणाचा सपाटा लावल्याने पावसाळ्यात ओढ्यांचे पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही ते डोळेझाक करीत आहेत. खंडाळा तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावर कारखानदारी उभी राहत आहे. त्यामुळे कंपन्यांबरोबर कामगारांचीही संख्या वाढली आहे. साहजिकच बांधकाम व्यावसायिकांची नजर खंडाळ्याकडे वळली आहे. त्यासाठी बिल्डर लोकांनी ठिकठिकाणी जागा खरेदी करून व्यावसायिक दृष्टिकोनातून सपाटीकरण चालू ठेवले आहे. तालुक्यात डोंगर टेकड्यांच्या बाजूने असणारे नैसर्गिक ओढे बंद करून ते मुजवले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही, असे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीमालाचे लाखोंचे नुकसान होत आहे. मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नाही. खंडाळा तालुक्यात ठिकठिकाणी ओढ्यांवर नळ्या टाकून त्यावरून खासगी रस्ते बनवले गेले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण ओढेच नावाखाली नैसर्गिक समतोल ढासळला जात आहे. अधिकारीही तात्पुरती समज देऊन प्रकरण मिटवतात; मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे तालुक्यातील टेकड्या तर लुप्त झाल्याच आहेत. वृक्षतोडही भरपूर प्रमाणात झाली आहे. आता ओढेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार हा मोठा प्रश्न आहे. हळूहळू ओढ्यांचे आकार कमी होऊ लागलेत. त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. जमिनींना लाखोंच्या किमती येत असल्याने फुटाफुटाने जागा वाढविण्याचा परिणाम ओढ्यांवर होत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)  

माझ्या शेताजवळील ओढ्यावर अतिक्रमण करून जमीन सपाटीकरण केल्याने पावसाळ्यात पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण कांदा पीक पाण्यात वाहून गेले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, अद्याप कोणताही निर्णय कळविण्यात आला नाही. - शामराव निकम, हरळी