शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
3
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
6
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
7
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
8
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
9
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
10
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
11
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
12
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
13
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
14
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
15
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
16
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
17
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
18
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
19
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
20
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका

भूसंपादनाचा नांगर शेतकऱ्यांच्या घरावर

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

केसुर्डीतील शेतकरी भूमिहीन : क्षेत्रधारकास नोटीस न देताच मोजणी

खंडाळा : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्यात मोठे बदल होत आहेत. परंतु, यात स्थानिक शेतकरी मात्र भरडला जात आहे. केसुर्डी येथे औद्योगिक वसाहतीचा दुसरा टप्पा उभारण्यात येत आहे. यासाठी शेकडो एकर जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांची पिळवणूक चालू असून, या जमिनीच्या मोजणीच्या नोटिसा शेजारील क्षेत्रधारकांना न काढताच मोजणी करून सीमा निश्चित केल्या जात आहेत. वास्तविक केसुर्डीतील दोनशे एकर लाभक्षेत्रातील ४० ते ४५ शेतकरी भूमिहीन होत असताना यावर गेल्या पाच वर्षांत कोणताही तोडगा निघाला नाही. स्थानिक शेतकरी मात्र शासनाच्या भूमिकेकडे डोळे लावून बसला आहे. केसुर्डी येथील माळरानावर औद्योगिकीकरणाचा दुसरा टप्पा व विशेष आर्थिक क्षेत्राचा आराखडा शासनाने तयार केला आहे. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. याच क्षेत्राचे मोजमाप शासनाच्या औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्याचे काम वेगाने सुरू आहे. भूमिअभिलेख कार्यालयाच्या मार्फत संबंधित क्षेत्राच्या लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा जाणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही क्षेत्रधारकास नोटिसा न बजावता मोजणी करून सीमा निश्चित करण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उर्वरित क्षेत्रतरी वाचेल का, या प्रश्नाने जखडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.एकतर औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे केसुर्डी गावातील ४० ते ४५ शेतकरी भूमिहीन होत आहेत. या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अनेकदा शासनाकडे गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत यावर तोडगा काढण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गापासून केसुर्डी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)पर्यंत कारखानदारांच्या सोयींसाठी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र, या रस्त्यासाठीही एका बाजूने शेतकऱ्यांच्याच जमिनी घेतल्या जाण्याची शक्यता आहे. याची कानकून लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा भरडला जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम शासनाने औद्योगिक वसाहतीच्या अधिग्रहित जमिनीतूनच करावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.भूसंपादनावर उभारणाऱ्या कारखान्यांमधून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप तरी उभ्या राहिलेल्या कंपन्याकडून स्थानिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)अधिग्रहण केलेल्या क्षेत्राच्या मापनाच्या नोटिसा लगतच्या शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शिवाय इथे बनविल्या जाणाऱ्या चौपदरीकरण रस्त्यालाही आमच्याच जमिनी जात आहेत. सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. यापुढेही हा अन्याय सहन करणार नाही.-प्रमोद जाधव, केसुर्डी