शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

भूसंपादनाचा नांगर शेतकऱ्यांच्या घरावर

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

केसुर्डीतील शेतकरी भूमिहीन : क्षेत्रधारकास नोटीस न देताच मोजणी

खंडाळा : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्यात मोठे बदल होत आहेत. परंतु, यात स्थानिक शेतकरी मात्र भरडला जात आहे. केसुर्डी येथे औद्योगिक वसाहतीचा दुसरा टप्पा उभारण्यात येत आहे. यासाठी शेकडो एकर जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांची पिळवणूक चालू असून, या जमिनीच्या मोजणीच्या नोटिसा शेजारील क्षेत्रधारकांना न काढताच मोजणी करून सीमा निश्चित केल्या जात आहेत. वास्तविक केसुर्डीतील दोनशे एकर लाभक्षेत्रातील ४० ते ४५ शेतकरी भूमिहीन होत असताना यावर गेल्या पाच वर्षांत कोणताही तोडगा निघाला नाही. स्थानिक शेतकरी मात्र शासनाच्या भूमिकेकडे डोळे लावून बसला आहे. केसुर्डी येथील माळरानावर औद्योगिकीकरणाचा दुसरा टप्पा व विशेष आर्थिक क्षेत्राचा आराखडा शासनाने तयार केला आहे. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. याच क्षेत्राचे मोजमाप शासनाच्या औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्याचे काम वेगाने सुरू आहे. भूमिअभिलेख कार्यालयाच्या मार्फत संबंधित क्षेत्राच्या लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा जाणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही क्षेत्रधारकास नोटिसा न बजावता मोजणी करून सीमा निश्चित करण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उर्वरित क्षेत्रतरी वाचेल का, या प्रश्नाने जखडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.एकतर औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे केसुर्डी गावातील ४० ते ४५ शेतकरी भूमिहीन होत आहेत. या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अनेकदा शासनाकडे गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत यावर तोडगा काढण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गापासून केसुर्डी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)पर्यंत कारखानदारांच्या सोयींसाठी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र, या रस्त्यासाठीही एका बाजूने शेतकऱ्यांच्याच जमिनी घेतल्या जाण्याची शक्यता आहे. याची कानकून लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा भरडला जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम शासनाने औद्योगिक वसाहतीच्या अधिग्रहित जमिनीतूनच करावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.भूसंपादनावर उभारणाऱ्या कारखान्यांमधून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप तरी उभ्या राहिलेल्या कंपन्याकडून स्थानिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)अधिग्रहण केलेल्या क्षेत्राच्या मापनाच्या नोटिसा लगतच्या शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शिवाय इथे बनविल्या जाणाऱ्या चौपदरीकरण रस्त्यालाही आमच्याच जमिनी जात आहेत. सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. यापुढेही हा अन्याय सहन करणार नाही.-प्रमोद जाधव, केसुर्डी