शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यात्रेतील लाखोंचा खर्च जलसंधारणासाठी -- गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:37 IST

म्हसवड : माण तालुक्यातील दिवड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांना केला जाणारा लाखो रुपयांचा अनाठाई खर्च यावर्षी

सचिन मंगरुळे ।म्हसवड : माण तालुक्यातील दिवड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांना केला जाणारा लाखो रुपयांचा अनाठाई खर्च यावर्षी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बचत झालेली रक्कम गावच्या जलसंधारण कामांसाठी खर्च केली जाणार आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दुष्काळी म्हणून परिचित असलेल्या माण तालुक्यातील अनेक गावांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे पूर्णत्वास आली आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातूनही अनेक गावे दुष्काळमुक्त होऊन पाणीदार झाली आहेत. या गावांचा आदर्श घेऊन यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये सहभागी होत गावाला दुष्काळ मुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

हे करीत असताना गावाने ग्रामदैवताच्या यात्रेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर लाखो रुपयांचीहोणारी उधळपट्टी थांबवून ही रक्कम पाणी फाउंडेशनच्या कामांना वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दिवड हे गाव म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या २ हजार ७६३ आहे. या गावाला उन्हाळ्यात चार महिने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या नेहमीच्या पाणीटंचाईवर व दुष्काळावर मात करण्याचा सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

यात्रा कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्रित येत गावाला दुष्काळमुक्त करण्याचे पाऊल उचलेले असून, हा निर्णय घेण्यासाठी अशोकशेठ सावंत,सरपंच रामचंद्र सावंत, उपसरपंच दादासो सावंत, जगन्नाथ सावंत, सदाशिव सावंत, अंकुश भोसले, गंगाराम सावंत, नामदेव सावंत,हणमंत सावंत, चेअरमन नवनाथ शिंदे, नीलेश सावंत, मच्छिंद्र भोसले, नवनाथ दगडे, राजू सावंत यांनी प्रमुख भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या निर्णयाचे स्वर स्तरातून कौतुक होत आहे. 

पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब आडवून वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात करणार आहे. दिवड गावची दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी व गाव पाणीदार करण्यासाठी आता ग्रामस्थ एकवटले आहेत.- रामचंद्र्र सावंत, सरपंच

 

आम्ही दरवर्षी यात्राकाळात मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करत होतो. तो खर्च यंदाच्या यात्रेत न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, ही सर्व रक्कम जलसंधारणाच्या कामावर खर्च केली जाणार आहे.- हणमंत सावंत, यात्रा कमिटी सदस्य