शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत!--सातारनामा

By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST

कऱ्हाडात रंगला विश्वासघाताचा खेळ : सुडाच्या राजकारणात प्रत्येकाचीच पाठ रक्ताळलेली!---

राजकारण म्हणजे ‘फिरवाफिरवीचा शब्द’. राजकारण म्हणजे ‘बुडवाबुडवीचा व्यवहार’. इथं दिला शब्द पाळायचा नसतो अन् घेतला शब्द झेलायचाही नसतो, तरीही ‘विश्वास’ नावाचा शब्द थोडाफार का होईना कुठं तरी टिकवायचा असतो... पण ‘कऱ्हाड’च्या रणांगणात यंदा विश्वासघातानं केला भलताच थयथयाट. प्रत्येकाच्या हातातल्या खंजिरांचा झाला खणखणाट. निष्ठेनं केला कळवळून आकांत... अन् जखमाळलेल्या पाठींना लागली पुढच्या पाच वर्षांची भ्रांत.‘सलग सातवेळा काँग्रेसची आमदारकी भोगलेल्या विलासकाकांना यंदा पक्षानं दगा दिला,’ असं काका समर्थकांचं ठाम मत. खरंतर, ‘चढता सुरज धीरे-धीरे ढल जायेगा,’ हे अनुभवी काकांना माहीत असायला हवं होतं. ‘परिवर्तन हा काळाचा अटळ सिद्धांत,’ हेही ध्यानात घ्यायला हवं होतं. पक्षानं घात केला म्हणून रक्ताळलेल्या पाठीनिशी त्यांनी बंडखोरीचा खंजीर उपसला. ‘विश्वासघाताचा बदला’ उंडाळे पट्ट्यात उसळत गेला. याचवेळी अजून एक खंजीर ‘भाजप’वाल्यांनी अतुलबाबांच्या हाती दिला. ‘या निवडणुकीत बाजूला थांबा, असं बाबांनी मला स्पष्टपणे सांगितलं असतं तर मी शांत बसलो असतो,’ ही त्यांची खंत केव्हा सुडाची आग बनून पेटत गेली, हे ‘कृष्णा’काठी कुणालाच कळलं नाही. यानंतर ‘राष्ट्रवादी’नं मस्तपैकी ‘मस्का-चस्का’ लावलेला खंजीर राजेंद्र यादवांच्या पाठीवरून हळूवारपणे फिरविला. माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभारण्याचं धाडस करणाऱ्या ‘राजेंद्रबाबांची हवा’ त्यांच्याच पक्षानं काढून घेतली; पण तेही भलतेच महाउस्ताद निघाले. त्यांनी बारामतीच्या ‘खंजीर’करांना कऱ्हाडचा खराखुरा ‘सोनेरी खंजीर’ दाखवला. पृथ्वीराज बाबांना पाठिंबा देऊन त्यांनी राष्ट्रवादीला अक्षरश: तोंडघशी पाडलं. हे सारे खंजीर कमी पडले की काय म्हणून अखेर बाळासाहेबांनी आपला ‘अस्सल खंजीर’ बाहेर काढला. ‘राष्ट्रवादी’च्या खेळीला ‘टांग’ मारून काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांचं ‘बोट’ धरलं. एकीकडं ‘उत्तर’मध्ये काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका करायची अन् दुसरीकडं ‘दक्षिण’मध्ये काँग्रेसवाल्यांच्याच मांडीला मांडी लावून कौतुकाची भाषणं ठोकायची, अशी दुटप्पी भूमिका आमदार गटानं घेतली. विशेष म्हणजे, काकांबरोबरची ‘राजकीय सोयरीक’ही एका रात्रीत मोडून टाकली. आता बाळासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्याची जबाबदारी आनंदरावांवर होती. आयुष्यभर पक्षनिष्ठेच्या बाता मारणाऱ्या नानांच्या कार्यकर्त्यांनी ‘उत्तर’मध्ये ‘घड्याळाचाच गजर’ ऐकला. ऐकविला. पृथ्वीराजबाबांच्या जीवावर हालचाल करणारा ‘धैर्यशीलचा हात’ परस्पर दाबला गेला. आपल्याच नेत्यांनी केलेला हा ‘पाठीवरचा घाव’ कदमांना सहन करण्यापलीकडचा होता. आता त्यांच्या भळभळलेल्या ‘जखमांची खपली’ दीडशे कोटींच्या कामांनी भरून निघेल की नाही, माहीत नाही... परंतु एकंदरच, ‘खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत’ कऱ्हाडच्या आसमंतात घुमला. गद्दारांच्या धुमश्चक्रीत विश्वासघाताची आरोळी प्रत्येकाचाच थरकाप उडवून गेली. बाळासाहेबांच्या जिलेबीत ‘आनंदा’ची साखर!जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाच आमदारांपैकी सर्वात कमी मताधिक्य बाळासाहेबांना मिळालं, तरीही त्यांची चक्क ‘जिलेबी तुला’ करण्यात आली. कारण ‘बाळासाहेबांच्या जिलेबीत आनंदाची साखर’ होती. यंदाच्या रणांगणात सर्वात धारदार खंजीर बाळासाहेबांच्या हातात होतं. ‘दक्षिणमध्ये विलासकाकांचा प्रचार करा,’ असे वारंवार निरोप पाठवूनही कऱ्हाडातील नेत्यांकडून ‘बारामतीकरांना ठेंगा’च बघायला मिळाला. दोन्ही पवारांचे मोबाईल कॉलही म्हणे घेतले जात नव्हते. शेवटी हा तातडीचा खलिता समक्ष पोहोचविण्यासाठी ‘बारामती’करांचे ‘देशमुखी दूत’ही कऱ्हाडात दाखल झाले होते, तरीही त्यांना पद्धतशीर टाळण्यात आलं.‘कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीराजबाबांचा पराभव करणारच!’ अशी राणा भीमदेवी थाटात प्रतिज्ञा करणाऱ्या ‘अजितदादांचा शब्द अन् पक्षाची प्रतिष्ठा’ पार धुळीला मिळविण्याचा मान त्यांच्याच आमदार गटानं पटकावला. कऱ्हाड प्रकारणामुळं म्हणे दादांना पुन्हा एकदा ‘आत्मक्लेष’ झाले. आपणच वाटलेले खंजीर आपल्याच पाठीत शिरू शकतात, याचा दाहक अनुभव दादांसाठी अत्यंत धक्कादायक होता.‘बाळासाहेबांच्या हातात खंजीर’ तसा जनतेला नवा नाही. कऱ्हाड पालिकेत उदयनराजे गटासोबत. पंचायत समितीत विलासकाकांबरोबर. अन् मलकापुरात पृथ्वीराजबाबांसोबत... असा वेगवेगळा ‘राजकीय संसार’ थाटणाऱ्या या नेत्याला यंदा जनतेनंच जमिनीवर आणलंय. गेली पाच वर्षे बेचाळीस हजारांच्या हवेत असलेले आमदार महाशय नेहमी म्हणायचे की, ‘विजयासाठी मला कुणाचीच गरज नाही!’ आता मात्र म्हणे सूतासारखं सरळ झालेत. पुरते जमिनीवर आलेत. त्यांचे जिवलग मित्र आनंदरावांचंही विमान म्हणे आता लँडिंग झालंय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबांनी त्यांना थेट शहराबाहेर पाठवून दिलं. नुसता ‘नेत्याजवळ वशिला’ असून चालत नाही. ‘जनमानसात प्रतिमा’ ही असावी लागते, हेही यानिमित्तानं स्पष्ट झालं की राऽऽव. सचिन जवळकोटे