शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत!--सातारनामा

By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST

कऱ्हाडात रंगला विश्वासघाताचा खेळ : सुडाच्या राजकारणात प्रत्येकाचीच पाठ रक्ताळलेली!---

राजकारण म्हणजे ‘फिरवाफिरवीचा शब्द’. राजकारण म्हणजे ‘बुडवाबुडवीचा व्यवहार’. इथं दिला शब्द पाळायचा नसतो अन् घेतला शब्द झेलायचाही नसतो, तरीही ‘विश्वास’ नावाचा शब्द थोडाफार का होईना कुठं तरी टिकवायचा असतो... पण ‘कऱ्हाड’च्या रणांगणात यंदा विश्वासघातानं केला भलताच थयथयाट. प्रत्येकाच्या हातातल्या खंजिरांचा झाला खणखणाट. निष्ठेनं केला कळवळून आकांत... अन् जखमाळलेल्या पाठींना लागली पुढच्या पाच वर्षांची भ्रांत.‘सलग सातवेळा काँग्रेसची आमदारकी भोगलेल्या विलासकाकांना यंदा पक्षानं दगा दिला,’ असं काका समर्थकांचं ठाम मत. खरंतर, ‘चढता सुरज धीरे-धीरे ढल जायेगा,’ हे अनुभवी काकांना माहीत असायला हवं होतं. ‘परिवर्तन हा काळाचा अटळ सिद्धांत,’ हेही ध्यानात घ्यायला हवं होतं. पक्षानं घात केला म्हणून रक्ताळलेल्या पाठीनिशी त्यांनी बंडखोरीचा खंजीर उपसला. ‘विश्वासघाताचा बदला’ उंडाळे पट्ट्यात उसळत गेला. याचवेळी अजून एक खंजीर ‘भाजप’वाल्यांनी अतुलबाबांच्या हाती दिला. ‘या निवडणुकीत बाजूला थांबा, असं बाबांनी मला स्पष्टपणे सांगितलं असतं तर मी शांत बसलो असतो,’ ही त्यांची खंत केव्हा सुडाची आग बनून पेटत गेली, हे ‘कृष्णा’काठी कुणालाच कळलं नाही. यानंतर ‘राष्ट्रवादी’नं मस्तपैकी ‘मस्का-चस्का’ लावलेला खंजीर राजेंद्र यादवांच्या पाठीवरून हळूवारपणे फिरविला. माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभारण्याचं धाडस करणाऱ्या ‘राजेंद्रबाबांची हवा’ त्यांच्याच पक्षानं काढून घेतली; पण तेही भलतेच महाउस्ताद निघाले. त्यांनी बारामतीच्या ‘खंजीर’करांना कऱ्हाडचा खराखुरा ‘सोनेरी खंजीर’ दाखवला. पृथ्वीराज बाबांना पाठिंबा देऊन त्यांनी राष्ट्रवादीला अक्षरश: तोंडघशी पाडलं. हे सारे खंजीर कमी पडले की काय म्हणून अखेर बाळासाहेबांनी आपला ‘अस्सल खंजीर’ बाहेर काढला. ‘राष्ट्रवादी’च्या खेळीला ‘टांग’ मारून काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांचं ‘बोट’ धरलं. एकीकडं ‘उत्तर’मध्ये काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका करायची अन् दुसरीकडं ‘दक्षिण’मध्ये काँग्रेसवाल्यांच्याच मांडीला मांडी लावून कौतुकाची भाषणं ठोकायची, अशी दुटप्पी भूमिका आमदार गटानं घेतली. विशेष म्हणजे, काकांबरोबरची ‘राजकीय सोयरीक’ही एका रात्रीत मोडून टाकली. आता बाळासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्याची जबाबदारी आनंदरावांवर होती. आयुष्यभर पक्षनिष्ठेच्या बाता मारणाऱ्या नानांच्या कार्यकर्त्यांनी ‘उत्तर’मध्ये ‘घड्याळाचाच गजर’ ऐकला. ऐकविला. पृथ्वीराजबाबांच्या जीवावर हालचाल करणारा ‘धैर्यशीलचा हात’ परस्पर दाबला गेला. आपल्याच नेत्यांनी केलेला हा ‘पाठीवरचा घाव’ कदमांना सहन करण्यापलीकडचा होता. आता त्यांच्या भळभळलेल्या ‘जखमांची खपली’ दीडशे कोटींच्या कामांनी भरून निघेल की नाही, माहीत नाही... परंतु एकंदरच, ‘खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत’ कऱ्हाडच्या आसमंतात घुमला. गद्दारांच्या धुमश्चक्रीत विश्वासघाताची आरोळी प्रत्येकाचाच थरकाप उडवून गेली. बाळासाहेबांच्या जिलेबीत ‘आनंदा’ची साखर!जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाच आमदारांपैकी सर्वात कमी मताधिक्य बाळासाहेबांना मिळालं, तरीही त्यांची चक्क ‘जिलेबी तुला’ करण्यात आली. कारण ‘बाळासाहेबांच्या जिलेबीत आनंदाची साखर’ होती. यंदाच्या रणांगणात सर्वात धारदार खंजीर बाळासाहेबांच्या हातात होतं. ‘दक्षिणमध्ये विलासकाकांचा प्रचार करा,’ असे वारंवार निरोप पाठवूनही कऱ्हाडातील नेत्यांकडून ‘बारामतीकरांना ठेंगा’च बघायला मिळाला. दोन्ही पवारांचे मोबाईल कॉलही म्हणे घेतले जात नव्हते. शेवटी हा तातडीचा खलिता समक्ष पोहोचविण्यासाठी ‘बारामती’करांचे ‘देशमुखी दूत’ही कऱ्हाडात दाखल झाले होते, तरीही त्यांना पद्धतशीर टाळण्यात आलं.‘कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीराजबाबांचा पराभव करणारच!’ अशी राणा भीमदेवी थाटात प्रतिज्ञा करणाऱ्या ‘अजितदादांचा शब्द अन् पक्षाची प्रतिष्ठा’ पार धुळीला मिळविण्याचा मान त्यांच्याच आमदार गटानं पटकावला. कऱ्हाड प्रकारणामुळं म्हणे दादांना पुन्हा एकदा ‘आत्मक्लेष’ झाले. आपणच वाटलेले खंजीर आपल्याच पाठीत शिरू शकतात, याचा दाहक अनुभव दादांसाठी अत्यंत धक्कादायक होता.‘बाळासाहेबांच्या हातात खंजीर’ तसा जनतेला नवा नाही. कऱ्हाड पालिकेत उदयनराजे गटासोबत. पंचायत समितीत विलासकाकांबरोबर. अन् मलकापुरात पृथ्वीराजबाबांसोबत... असा वेगवेगळा ‘राजकीय संसार’ थाटणाऱ्या या नेत्याला यंदा जनतेनंच जमिनीवर आणलंय. गेली पाच वर्षे बेचाळीस हजारांच्या हवेत असलेले आमदार महाशय नेहमी म्हणायचे की, ‘विजयासाठी मला कुणाचीच गरज नाही!’ आता मात्र म्हणे सूतासारखं सरळ झालेत. पुरते जमिनीवर आलेत. त्यांचे जिवलग मित्र आनंदरावांचंही विमान म्हणे आता लँडिंग झालंय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबांनी त्यांना थेट शहराबाहेर पाठवून दिलं. नुसता ‘नेत्याजवळ वशिला’ असून चालत नाही. ‘जनमानसात प्रतिमा’ ही असावी लागते, हेही यानिमित्तानं स्पष्ट झालं की राऽऽव. सचिन जवळकोटे