शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कुठायत ‘अच्छे दिन’? जनतेचा भ्रमनिरास!

By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST

अजित पवारांचे टीकास्त्र : ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षक भरती रोखल्याने बेरोजगारीत वाढ; अठरा महिन्यांत युवकांची फरफट

रहिमतपूर : ‘राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षणमंत्र्यानी शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी आणली आहे. परिणामी, समाजात बेकारीचे प्रमाण वाढून बेरोजगार तरुणांच्या समस्या वाढत आहेत. १५ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या या सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली तरुण, शेतकरी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कोरेगावच्या सभापती रूपाली जाधव, सुनील खत्री, सुभाषराव शिंंदे, लक्ष्मीताई गायकवाड, जितेंद्र पवार, मानसिंंगराव जगदाळे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘सरकारला राज्यकारभार करता येत नाही. राज्यातील हजारो माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सहकारी क्षेत्रामध्येही जागा रिक्त आहेत. यासाठी शिक्षकांनी नागपूर अधिवेशनात मोर्चे काढले व उपोषणे केली तरी त्याची दखल घेतली जात नाही.आमचे सरकार असते तर नोकरभरती व दुष्काळासंदर्भात लगेच निर्णय घेऊन हजारो घरे आपल्या पायावर उभी केली असती.’कार्यक्रमास अ‍ॅड. नितीन भोसले, सागर पाटील, शाहूराज फाळके, शहाजी क्षीरसागर, अनिवाश माने, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अशोक पवार, संभाजी गायकवाड तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब सोळसकर यांचे भाषणे झाले. सोमनाथ गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)