शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कुठायत ‘अच्छे दिन’? जनतेचा भ्रमनिरास!

By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST

अजित पवारांचे टीकास्त्र : ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षक भरती रोखल्याने बेरोजगारीत वाढ; अठरा महिन्यांत युवकांची फरफट

रहिमतपूर : ‘राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षणमंत्र्यानी शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी आणली आहे. परिणामी, समाजात बेकारीचे प्रमाण वाढून बेरोजगार तरुणांच्या समस्या वाढत आहेत. १५ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या या सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली तरुण, शेतकरी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कोरेगावच्या सभापती रूपाली जाधव, सुनील खत्री, सुभाषराव शिंंदे, लक्ष्मीताई गायकवाड, जितेंद्र पवार, मानसिंंगराव जगदाळे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘सरकारला राज्यकारभार करता येत नाही. राज्यातील हजारो माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सहकारी क्षेत्रामध्येही जागा रिक्त आहेत. यासाठी शिक्षकांनी नागपूर अधिवेशनात मोर्चे काढले व उपोषणे केली तरी त्याची दखल घेतली जात नाही.आमचे सरकार असते तर नोकरभरती व दुष्काळासंदर्भात लगेच निर्णय घेऊन हजारो घरे आपल्या पायावर उभी केली असती.’कार्यक्रमास अ‍ॅड. नितीन भोसले, सागर पाटील, शाहूराज फाळके, शहाजी क्षीरसागर, अनिवाश माने, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अशोक पवार, संभाजी गायकवाड तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब सोळसकर यांचे भाषणे झाले. सोमनाथ गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)