शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

विधानसभेच्या कुरुक्षेत्रात राजेंचा ‘दबावगट’ सक्रिय

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

संधीचा सदुपयोग : जिल्ह्याच्या राजकारणात अढळपद मिळविण्याच्या खेळी यशस्वी

राजीव मुळ्ये - सातारा --लोकसभा निवडणुकीनंतरचा काळ शांततेत व्यतीत केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयुधे परजली असून, जिल्ह्याच्या राजकारणात अढळपद प्राप्त करण्याच्या खेळी दाखविल्या आहेत. या सर्व घडामोडी राजेंच्या आक्रमक राजकारणाचीच चिन्हे मानली जात असून, जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषत: निर्णयप्रक्रियेत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून कायम राहील, असा माहीतगारांचा होरा आहे.पक्षांतर्गत विरोधाची धार निष्प्रभ करण्यासाठी उदयनराजेंनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून यशस्वी डावपेच खेळल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीचा आणि निर्णयप्रक्रियेवर रामराजे नाईक-निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांचा वरचष्मा नेहमी पाहायला मिळाला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडींमध्येही याच दोघांचा शब्द प्रमाण मानला गेला. याउलट ‘उदयनराजे हाच पक्ष’ अशी घोषणा करून श्रेष्ठींनाही वारंवार आव्हान देणारे उदयनराजे पक्षांतर्गत वर्तुळात महत्त्वाचे स्थान पटकावू शकले नाहीत. उलट निर्णयप्रक्रियेत त्यांचा शब्द निष्प्रभ करण्याचेच प्रयत्न झाले. अगदी खासदारकीचे तिकीट मिळवितानाही त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी ठरावही झाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर्गत विरोधकांनी अनेक मार्गांनी त्यांची वाट रोखण्याचे प्रयत्न केले, हा ताजा इतिहास आहे.निवडणुकीत मात्र उदयनराजेंनी सचिन तेंडुलकरच्या भूमिकेत टीकाकारांना, विरोधकांना कृतीतूनच उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातून चार खासदार निवडून आले. त्यातील दोघांना निसटता विजय मिळाला; पण उदयनराजेंनी मात्र सर्वाधिक मताधिक्य मिळवून अंतर्गत विरोधकांचा आवाज क्षीण केला. त्यानंतर जणू विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असल्याप्रमाणेच ते शांत राहिले आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी त्यांनी भात्यातले पहिले अस्त्र बाहेर काढले. ‘कार्यकर्त्यांना जिल्ह्यात दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली तर वेगळा विचार करेन,’ अशी तंबी देऊन त्यांनी दबावतंत्राची खेळी खेळली आणि उपाध्यक्षपद खेचून आणले.कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात विलासकाका उंडाळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत तिकीट घेण्याचा आग्रह पक्षाकडून झाला. काकांनी तो अमान्य करताच राष्ट्रवादीला पर्याय शोधावा लागला आणि या ठिकाणीही उदयनराजेंनी आपल्या विश्वासातील राजेंद्र यादव यांच्या नावावर सहमती मिळवून पुन्हा यशस्वी खेळी केली. ही सर्व राजेंच्या आक्रमक राजकारणाचीच चिन्हे मानली जात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा आणि निर्णयप्रक्रियेतील ‘व्हॉल्यूम’ वाढविण्याचा प्रवास आता गतिमानच होत राहील, असे माहीतगारांना वाटते. प्रचारातील सक्रियताही सूचकपक्षनेतृत्वाला न जुमानणारे, आपल्या मर्जीचे मालक आणि सर्वच पक्षांमध्ये मित्र असणारे उदयनराजे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ‘आघाडीधर्मा’चा उद््घोष करणारे, काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ दिल्याबद्दल उदयनराजेंवर नाराज राहिले. पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नसल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. मकरंद पाटील यांच्या व्यासपीठावर पाच वर्षांनी हजेरी लावल्यानंतर लगेच मदन भोसलेंचीही भेट घेऊन त्यांनी सर्वांना भुवया उंचावायला लावल्या होत्या. यावर्षी मात्र शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून सक्रिय राहून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले असून, यापुढे पक्षात आणि जिल्ह्यात खुंटा बळकट करण्याचे संकेत दिले आहेत. ‘हाडाचे कार्यकर्ते’ उद्या जिंकणार?जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड झाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सभापती निवडींचा मुद्दा उपस्थित करून ‘हाडाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी’ मिळायला पाहिजे, अशी सूचक मांडणी करून जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या शब्दाला मान देण्याशिवाय यापुढे गत्यंतर नाही, असा इशाराच उदयनराजेंनी दिला आहे. सभापती निवडी येत्या गुरुवारी (दि. २) होत असून, त्यावेळी उदयनराजेंचा हाच नूर कायम राहील, असे दिसते. ‘हाडाचे कार्यकर्ते’ जिंकणार का, हे पाहावे लागेल.