शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’ची योजना राज्यात राबविणार!

By admin | Updated: November 26, 2015 00:06 IST

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : अतुल भोसलेंकडून एकरी शंभर टन उसाच्या योजनेचे लॅपटॉपवर सादरीकरण

कऱ्हाड : ‘शेतीच्या प्रगतीसाठी कमीत कमी जागेत जास्त उत्पादन घेणे गरजेचे असून, त्यादृष्टीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आखलेल्या ‘ऊसविकास योजना उद्दिष्ट १०० टन व ठिबक सिंंचनातून पाणी व्यवस्थापन’ या योजनेला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. भविष्यात ही योजना राज्यातही राबविण्याचा विचार करु,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश चिटणीस, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना दिली.कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित १२ व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी थेट यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्टॉलला भेट दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर यांनी मुख्यमंंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेश चिटणीस तथा कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऊसविकास योजनेबाबत लॅपटॉपच्या माध्यमातून सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी कारखान्याच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या योजनेचे विशेष कौतुक करून शेतीच्या प्रगतीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ राबवित असलेली ही योजना स्तुत्य असल्याचे नमूद केले. भविष्यात ही योजना राज्यात राबविण्याचाही विचार सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आदी मान्यवरांनीही कारखान्याच्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. (प्रतिनिधी)दहा हजार एकर जागेवर लवकरच योजना कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुपिक जमीन, मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांकडून योग्य नियोजन होत नसल्याने सध्या एकरी ३२ मे. टन ऊस उत्पादन निघते. चुकीचे पाणी नियोजन, पाण्याचा अतिवापर तसेच रासायनिक खतांचा अतिवापर, यामुळे जमिनीचा पोत घसरत असल्याने कमी उत्पादन होत असून, यावर मार्ग काढण्यासाठी कृष्णा कारखान्याने ऊसविकास योजना आखली आहे. त्याद्वारे एकरी १०० मे. टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेच्या माध्यमातून एका एकरात सरासरी ८५ ते १०० मे. टन उत्पादन घेणे शक्य होणार असून, कारखान्याच्या माध्यमातून दहा हजार एकर जागेवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंंत्र्यांना सांगितले.