शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

कृष्णा प्रकल्प फेरजलनियोजनास राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त

By नितीन काळेल | Updated: October 1, 2023 21:14 IST

दुष्काळी भागाला लाभ : दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळप्रवण तसेच पाण्यापासून वंचित भागासाठी दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी अशी प्रमुख मोठी धरणे आहेत. या धरणातील पाण्यावर साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील शेती सिंचन होते. जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी आहे. तरीही माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात विविध योजनांतून पाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तरीही माण आणि खटाव तालुक्यातील काही भागात सिंचनापासून वंचित होता. या भागाच्या पाण्यासाठी आंदोलने झाली. तसेच लोकप्रतिनिधींनीही यासाठी शासनदरबारी आजाव उठवत आक्रमक मागणी लावून धरली. त्यामुळे हळूहळू का असेना वंचित भागांनाही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे. त्यातच राज्य शासनाने आता सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता दिली असल्याने आणखी काही भागाला पाणी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या फेर जलनियोजनास मान्यता दिलेली आहे. त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळप्रवण भागातील काही भाग पाण्यापासून वंचित होता. या भागासाठी आता दोन टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासन अध्यादेशाने आणि जलसंपदा विभागाने काढलेल्या आदेशानुसार कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित फेर नियोजनासाठीची संपूर्ण जबाबदारी ही कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंत्यांकडे राहणार आहे. तसेच यामुळे कृष्णा खोरे पाणी तंटा लवादामधील तरतुदीचा भंगही होणार नाही हेही पहावे लागणार आहे.चार तालुके; ९ हजार हेक्टरला लाभ...

फेर जलनियोजनानुसार दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्याबरोबरच साताऱ्यालाही होणार आहे. यामधून ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने लाभधारक शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मंजूर सुधारित पाणीवापर...

जिल्ह्यातील सिंचनासाठी धोम, कण्हेर, वसना आणि वंगणा योजनानिहाय पाणी वापर निश्चित करण्यात आला आहे. २००१ मधील ऑक्टोबरमध्ये लवादास सादर केलेल्या नियोजनानुसार २६.८६८ अब्ज घन फूट पाण्याचे नियोजन होते. तर ७ जानेवारी २०२२ नुसार पाणीवापर २८.११८ अब्ज घन फूट आहे. तर आता मंजूर सुधारित पाणीवापर वाढवून ३०.१३ अब्ज घनफूट करण्यात आला आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसर