शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा प्रकल्प फेरजलनियोजनास राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त

By नितीन काळेल | Updated: October 1, 2023 21:14 IST

दुष्काळी भागाला लाभ : दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळप्रवण तसेच पाण्यापासून वंचित भागासाठी दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी अशी प्रमुख मोठी धरणे आहेत. या धरणातील पाण्यावर साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील शेती सिंचन होते. जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी आहे. तरीही माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात विविध योजनांतून पाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तरीही माण आणि खटाव तालुक्यातील काही भागात सिंचनापासून वंचित होता. या भागाच्या पाण्यासाठी आंदोलने झाली. तसेच लोकप्रतिनिधींनीही यासाठी शासनदरबारी आजाव उठवत आक्रमक मागणी लावून धरली. त्यामुळे हळूहळू का असेना वंचित भागांनाही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे. त्यातच राज्य शासनाने आता सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता दिली असल्याने आणखी काही भागाला पाणी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या फेर जलनियोजनास मान्यता दिलेली आहे. त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळप्रवण भागातील काही भाग पाण्यापासून वंचित होता. या भागासाठी आता दोन टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासन अध्यादेशाने आणि जलसंपदा विभागाने काढलेल्या आदेशानुसार कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित फेर नियोजनासाठीची संपूर्ण जबाबदारी ही कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंत्यांकडे राहणार आहे. तसेच यामुळे कृष्णा खोरे पाणी तंटा लवादामधील तरतुदीचा भंगही होणार नाही हेही पहावे लागणार आहे.चार तालुके; ९ हजार हेक्टरला लाभ...

फेर जलनियोजनानुसार दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्याबरोबरच साताऱ्यालाही होणार आहे. यामधून ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने लाभधारक शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मंजूर सुधारित पाणीवापर...

जिल्ह्यातील सिंचनासाठी धोम, कण्हेर, वसना आणि वंगणा योजनानिहाय पाणी वापर निश्चित करण्यात आला आहे. २००१ मधील ऑक्टोबरमध्ये लवादास सादर केलेल्या नियोजनानुसार २६.८६८ अब्ज घन फूट पाण्याचे नियोजन होते. तर ७ जानेवारी २०२२ नुसार पाणीवापर २८.११८ अब्ज घन फूट आहे. तर आता मंजूर सुधारित पाणीवापर वाढवून ३०.१३ अब्ज घनफूट करण्यात आला आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसर