शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

वाईतील कृष्णा पूल लवकरच घेणार निरोप; नागरिक भावनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:20 IST

घडीव दगड घाटाच्या संवर्धनाला वापरण्याची होतेय मागणी

वाई : नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद असला तरी गेली अनेक वर्षे ज्यांनी वाईकरांना खंबीर साथ दिली, तोच कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल आता निरोप घेणार आहे. त्यामुळे वाईकरांचे मन हळवे होताना दिसत आहे. शेवटची आठवण म्हणून अनेक जण पुलावर उभे राहून फोटो काढत आहेत, काही जण सेल्फी विथ पूल करत आहेत तर काही जण शेवटचं पुलावरून पायी चालत जातं आहेत. पुलाच्या निघणाऱ्या घडीव दगडी कृष्णा नदीवरील घाट संवर्धनला वापरावे, अशी ही मागणी जोर धरत आहे तसेच सोशल मीडियावर ही अनेक भावुक प्रतिक्रिया देत आहेत.

वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा किसनवीर या मुख्य चौकास जाडणारा ब्रिटिशकालीन पूल आहे. गेली १३५ वर्षे ज्याने अनेक महाप्रचंड पूर झेलत वाईकरांची सेवा केली. स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी, अनेक हिंदी, मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचा साक्षीदार अनेक संकटातही न डगमगता वाईच्या दोन्ही भागाचा दुवा बनून खंबीरपणे कृष्णा नदीत आपले मजबूत पाय रोवून उभा राहिला व आपल्या कणखर पाठीवर आनंदाने ओझं वाहत राहिला.

वाई शहरामध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पूल हा १८८४ साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ साली ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्याबाबतीत पत्र पाठविण्यात आले होते. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पुलाची मागणी केली जात होती. दोन्ही भागांना जोडणारा सक्षम पर्याय नसल्याने व नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी देऊन नवीन तंत्रज्ञानाने युक्त १५ कोटीचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला.

वाई शहरास सक्षम पुलांची गरज

वाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असून प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने या ब्रिटिशकालिन पुलावर रहदारी मोठ्या प्रमाणावर होती महागणपती मंदिरासमोर बांधण्यात आलेला नवीन पुलाची उंची कमी असल्याने पूरपरिस्थितीत या पुलाचा काहीच उपयोग होत नव्हता. सध्याचा धोका व भविष्यातील गरज लक्षात घेऊन ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी एक नवीन सक्षम पुलाची गरज आहे.

- अनिल सावंत - नगराध्यक्ष वाई नगरपालिका प्रतिक्रिया

सांस्कृतिक, ऐतिहासिक वाई शहराच्या वैभवात भर टाकणारा व शेकडो शेकडो घटनांचा साक्षीदार शतकवीर पूल सेवानिवृत्ती घेतोय, ही घटना सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. पण भविष्याची गरज पाहता नवीन पुलाची गरज आहेच, त्यामुळे आनंद ही होत आहे. या पुलाच्या घडीव दगडी कृष्णा नदीवरील घाट दुरुस्तीला वापरावे, यामुळे पूल स्मरणात राहील.

- धनंजय मलटणे -सामाजिक कार्यकर्ते वाई

टॅग्स :Satara areaसातारा परिसर