शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

‘कोयना’तून ३२१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या ...

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातुन ३ हजार २१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली असून सध्या धरणात २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचे पाणी वाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीतचे तांत्रिक वर्षाचे कामकाज चालते. यामधे ६७.५० टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी व उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सुरुवातीला १ जूनला धरणात ३४.१८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर वर्षभरात पाऊस तसेच ओढे, नाल्यातुन तब्बल १३३. ८८ टीएमसी पाण्याची आवक झाली. पूरस्थितीत सहा वक्रदरवाजे व पायथा वीजगृहातुन २८.२२ टीएमसी पाणी पूर्वेला नदीपात्रात सोडण्यात आले तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर करीत ३०५४.८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली गेली. पायथा वीजगृहातुन सिंचन व पूरकाळात सोडलेल्या ३७.०६ टीएमसी पाण्यापासुन १६३.३९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. २०२०-२१ या तांत्रिक वर्षात विद्युत निर्मितीच्या चार टप्प्यातून व पायथा वीजगृहातून एकूण ३२१८.२६ दशलक्ष युनिटची वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातुन झाली आहे .

सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सिंचनासाठी ३२.८४ टीएमसी, नदी विमोचकातुन २.३१ टीएमसी, पुर काळात सहा वक्र दरवाजातून २३.९९ टीएमसी व पायथा वीजगृहातुन ४.२२ टीएमसी पाणी कोयना नदीत सोडले होते. गळती ०.०२ टीएमसी असे एकुण ६३.४० टीएमसी पाणी पूर्वेला कोयना नदीत सोडले आहे तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. बाष्पीभवनाव्दारे ७.८५ टीएमसी पाणी खर्च झाले आहे.

- चौकट

दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा

साठवण क्षमता १०५ टीएमसी असलेल्या कोयना धरणात सध्या २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असुन मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता २४.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ३४.१८ टीएमसी होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षाची तुलना केली असता सध्याचा पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या पायथा वीजगृहाचे एकच युनिट सुरू आहे. त्यामधून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. हीच मागणी कायम राहीली तर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.