शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

‘कोयना’तून ३२१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या ...

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातुन ३ हजार २१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली असून सध्या धरणात २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचे पाणी वाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीतचे तांत्रिक वर्षाचे कामकाज चालते. यामधे ६७.५० टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी व उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सुरुवातीला १ जूनला धरणात ३४.१८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर वर्षभरात पाऊस तसेच ओढे, नाल्यातुन तब्बल १३३. ८८ टीएमसी पाण्याची आवक झाली. पूरस्थितीत सहा वक्रदरवाजे व पायथा वीजगृहातुन २८.२२ टीएमसी पाणी पूर्वेला नदीपात्रात सोडण्यात आले तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर करीत ३०५४.८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली गेली. पायथा वीजगृहातुन सिंचन व पूरकाळात सोडलेल्या ३७.०६ टीएमसी पाण्यापासुन १६३.३९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. २०२०-२१ या तांत्रिक वर्षात विद्युत निर्मितीच्या चार टप्प्यातून व पायथा वीजगृहातून एकूण ३२१८.२६ दशलक्ष युनिटची वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातुन झाली आहे .

सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सिंचनासाठी ३२.८४ टीएमसी, नदी विमोचकातुन २.३१ टीएमसी, पुर काळात सहा वक्र दरवाजातून २३.९९ टीएमसी व पायथा वीजगृहातुन ४.२२ टीएमसी पाणी कोयना नदीत सोडले होते. गळती ०.०२ टीएमसी असे एकुण ६३.४० टीएमसी पाणी पूर्वेला कोयना नदीत सोडले आहे तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. बाष्पीभवनाव्दारे ७.८५ टीएमसी पाणी खर्च झाले आहे.

- चौकट

दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा

साठवण क्षमता १०५ टीएमसी असलेल्या कोयना धरणात सध्या २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असुन मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता २४.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ३४.१८ टीएमसी होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षाची तुलना केली असता सध्याचा पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या पायथा वीजगृहाचे एकच युनिट सुरू आहे. त्यामधून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. हीच मागणी कायम राहीली तर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.