शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर : ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:23 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१०० असे ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१०० असे ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत असलातरी गतवर्षीपेक्षा यंदा धरणे लवकर भरली आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अनेक धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. कोयनेतून तर सतत पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात सोमवारी सकाळी १०४.१८ टीएमसी साठा झाला होता. तर २४ तासांत १०० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात ३६१९९ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत वरती उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून आणि पायथा वीजगृहातून ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे.जिल्ह्यातील धोम धरणात १२.८० टीएमसी साठा असून, ३७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणातही ९.८३ टीएमसी साठा असून, २२०२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरातून १६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर, बलकवडी या धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम १३ /६०७कोयना १०० /५०८५बलकवडी ३७ /२५८०कण्हेर १०/७०३उरमोडी ४०/ ११९९तारळी ४१/ २१३२

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण