शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कडक उन्हामुळे कोरेगावचा राजमा धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

वाठार स्टेशन : दिल्लीकरांच्या जिभेची चव पुरविणारा कोरेगावचा राजमा (वाघा घेवडा) सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे धोक्यात आला आहे. ...

वाठार स्टेशन : दिल्लीकरांच्या जिभेची चव पुरविणारा कोरेगावचा राजमा (वाघा घेवडा) सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे धोक्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात हवामान आणि पर्जन्यमानानुसार पीक व्यवस्थापन केले जाते. त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात व खटाव तालुक्यातील काही भागांत वाघा घेवडा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काळात या पिकाला हमीभाव निश्चित नसल्याने आणि पावसाच्या लहरीपणामुळे या पिकास वाटाणा व सोयाबीन हे पर्याय पीक ठरले आहे. घेवड्यास अधिक पाऊस आणि कडक ऊन या दोन्ही गोष्टी सहन होत नसल्याने आता हे पीक धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हे पीक आता हातातून जाणार अशीच परिस्थिती सध्या दिसू लागली आहे. अजून चार-पाच दिवसांत जर पाऊस पडला नाही तर मात्र कडक उन्हामुळे घेवडा पीक वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

गेल्या अनेक वर्षांत राजमा (वाघा घेवडा) उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कधी कडक उन्हामुळे, तर कधी अधिक पावसाने घेवडा पीक वाया जात आहे. सध्या या भागातील घेवडा पेरणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाने गेल्या दहा दिवसांपासून उघडीप दिल्याने पेरणी केलेले हे पीक आता पावसाअभावी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

एका बाजूने दिल्लीच्या बाजारपेठेत मान असलेला राजमा मात्र अजूनही शासनाच्या पीकविम्यात नसल्याने या पिकाला नुकसान भरपाई मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. कोरेगाव-खटाव तालुक्यातील घेवडा पीकविम्यात घ्यावा, ही येथील शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी घेवडा उत्पादक शेतकरी करीत आहेत.