शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कोंडवे गावाला लागली विकासाची आस! उदयनराजेंकडून दत्तक

By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST

देशात ‘पथदर्शी’ बनण्यासाठी ग्रामस्थही एकवटले

 जगदीश कोष्टी -सातारा --पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्यास प्रारंभ झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी कोंडवे हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे गावाला विकासाची आस लागली असून, खासदारांच्या संकल्पनेतून गाव देशात आदर्श बनविण्यासाठी ग्रामस्थांनी साथ देण्यासाठी एकजूट दाखविली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी कोंडवे गाव दत्तक घेतल्याचे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांच्या नजरा या गावाकडे लागल्या आहेत. उदयनराजे भोसले वाई तालुक्यातील बावधन हे गाव दत्तक घेणार होते. मात्र, उदयनराजेंनी आपले गाव दत्तक घेतल्यास विकास झपाट्याने होईल, या आशेने कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. अन् त्याला जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, बबनराव चोरगे, बबनराव ननावरे यांची साथ लाभली. त्यामुळे उदयनराजेही त्यांचा आग्रह मोडू शकले नाहीत. सातारा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या कोंडवेला ग्रामपंचायत असली तरी ग्रामस्थांचा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सातारा शहराशी संबंध येत असतो. गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असली तरी असंख्य मुलं शिक्षणासाठी सातारा शहरात येतात. त्यामुळे या लोकांची नाळ शहराशीच अधिक घट्ट बांधली गेली आहे. ४,७७७ लोकसंख्येच्या कोंडवेत तेरा ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, दोन्ही वाड्यांना धरून असल्याने या गावात ‘मनोमिलन पॅटर्न’ चांगलाच रुजला आहे. गावात चोरगे, निंबाळकर, गाडे ही घराणी आहेत. गावात विविध कार्यकारी सोसायटी असून, ती खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या ताब्यात आहे. दृष्टिक्षेपात गाव लोकसंख्या : ४,७७७ स्त्रिया : २,३४७ पुरुष : २,५३० मतदार : ३,८४२ प्रभाग : ५ उत्पन्नाचे साधन : विविध प्रकारे कर व शासकीय योजना प्रमुख पिके : ऊस, ज्वारी, गहू जमीन खरेदी-विकी : प्रमाण कमी ग्रामदैवत : ज्योतिर्लिंग मंदिरे : ७ मशीद : १ गुन्हेगारीचे प्रमाण : कमी विविध योजनांत सहभाग सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणारे कोंडवे हे १९९३ मध्ये पहिले गाव ठरले होते. या स्वच्छतागृहावर बायोगॅस प्रणाली बसवून गॅस पुरवठा केला जात होता. तसेच या गावाने ‘पर्यावरणपूरक समृद्ध ग्राम’ योजनेत सहल तीन वर्षे यश मिळविले असून, २०१२-१३ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत प्रथम क्रमांक मिळविला होता. देशभक्तीचा वारसा सातारा जिल्हा शूरवीरांचा, पराक्रमींचा म्हणून ओळखला जातो. हाच वारसा कोंडवे गावानेही वारसा जपला आहे. दिनकरराव चोरगे, केशवराव चोरगे, मारुती निंबाळकर हे तीन स्वातंत्रसैनिक तसेच रामचंद्र निंबाळकर, यादवराव चोरगे हे कॅप्टन घडले आहेत. तसेच शिक्षणाधिकारी हणमंत भुजबळ, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष दिनकरराव बोडके हे याच गावातील असून, वर्षा गायकवाड, हणमंत गायकवाड यांचे मूळगाव कोंडवेच आहे. गावच्या यात्रेला ते येत असतात. राळेगणसिद्धी, हिवरे बुद्रुकला भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी गाव दत्तक घेतल्याचे समजताच गावात विविध योजना कशा प्रकारे आणता येतील याचा अभ्यास करण्यासाठी गावातील पंचवीस जणांचे पथक समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी तसेच हिवरे बुद्रुक या गावाला भेट देऊन आले आहे.