शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाचा खजिना रद्दीच्या भावात !

By admin | Updated: December 17, 2015 22:59 IST

कवडीमोल दर : पाच ते दहा रुपये दरात खरेदी-विक्री; पाठ्यपुस्तकांचा समावेश जास्त

कऱ्हाड : विद्यादान घडविणाऱ्या पाठ्यपुस्तकांतून अनेक जण ज्ञानार्जन करतात. अशा ज्ञानाजर्नाच्या साहित्याची, अमूल्य ठेव्याची किंमत मात्र, काही ठिकाणी कवडीमोलाची केली जात आहे. रद्दीविक्रीच्या दुकानात अभ्यासक्रमाची तसेच नामवंत लेखकांच्या पुस्तकांची किंमत वजनाच्या हिशोबाने केली जातेय. शंभर ते तीनशे रुपयांना विकत मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांना तसेच नामवंत विचारवंत, लेखक, साहित्यिकांच्या पुस्तकांची किंमत इथे मात्र, सात रुपये किलो दराने लावली जात आहे. त्यामुळे एकेकाळी ज्ञानार्जनाच्या साहित्यांना असलेले महत्त्व आताच्या काळात कमी होत असल्याचे दिसून येते.शैक्षणिकदृष्ट्या पाठ्यपुस्तकांना आजही महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी पूर्वापार परंपरेपासून ज्ञानेश्वरी, महाभारत तसेच भगवत गीता, कुराण अशा धर्मग्रंथांना आजही ज्ञानार्जनाचा अमूल्य ठेवा म्हणून महत्त्व दिले जाते. दुसरीकडे मात्र, अशा रद्दी व्यावसायिकांमुळे शालेय पाठ्यपुस्तके तसेच रद्दीला कवडीमोलाचा दर दिला जातो. वाचनाची आवड असलेल्या व्यक्ती हव्या तेवढ्या किंमतीमध्ये पुस्तके विकत घेतात. मात्र, दुसरीकडे हीच पुस्तके आपन ठरवून दिलेल्या दराप्रमाणे रद्दीवाले खरेदी करतात. त्यामुळे एक व्यावसायिक दृष्टीकोनातून पाठ्यपुस्तके तसेच ज्ञानार्जनाच्या साहित्याकडे रद्दीवाल्यांकडून पाहिले जाते.रद्दीविक्री करणारे व्यापारी आपल्या व्यवसायासाठी गरीब तसेच गरजू व्यक्तिंना हाताशी धरून शहरी तसेच ग्रामीण भागातून पाठ्यपुस्तकांची रद्दी खरेदी कवडीमोल दरात खरेदी करून घेतात. त्यानंतर एकत्र होणारी रद्दी गोदामात साठविली जाते. अशा प्रकारे दहा ते वीस रुपये किलो दराने खरेदी केलेली रद्दी आठवड्यातून एकदा मुंबई तसेच पुणे या ठिकाणी पाठविली जाते. आठवडाभर एकत्र करून एकदम ट्रकने रद्दीची विक्री केल्याने व्यापाऱ्यास चांगलाच फायदा होतो. कवडीमोल दरात महागड्या पुस्तकांची रद्दी विकत घेऊन त्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचाही चांगला व्यवसाय होत आहे. रद्दीविक्रीतून पेैसेकमाईकऱ्हाड शहरात गल्लोगल्ली रद्दीविक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. छोट्या-मोठ्या दुकानांसह यामध्ये काम करणारे कर्मचारीही मोठ्या संख्येने आहेत. मोठ्या रद्दीविक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानात तीन ते चार कामगार काम करण्यासाठी आहेत. त्यांच्याकडून शहरात फिरून पेपर, पुस्तक यांच्या रद्दीसह भंगाराचे साहित्यही कवडीमोल दरात लोकांकडून विकत घेतले जाते. व ते एकत्र केले जाते. या व्यवसायातून कर्मचाऱ्यांना दिवसाला तीनशे ते चारशे रुपये सहज मिळतात.असा चालतो व्यवसाय..!दिवसाला एकत्रित होणारी रद्दी तसेच भंगाराचे साहित्य हे आठवडाभर शहरातील गोडावूनमध्ये साठविले जाते. आठवडा पूर्ण झाला की ती रद्दी एकदम किराणा माल, साहित्य विक्री करणारे तसेच वडापाव विक्री करणाऱ्या दुकानदारांना घातली जाते. यातून रद्दीविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास चांगली कमाई मिळते.पुस्तकांची रद्दी सात रुपयातविविध विचारवंत, साहित्यिक तसेच लेखकांची पुस्तके तसेच शालेय पाठ्यपुस्तके ही फक्त ७ रुपये किलो दराने विकली जातात. साहित्यिकांचे व नामवंत लेखकांच्या विचारांना कवडीमोल दराने लोकांकडून अशा प्रकारे विकले जाते. पाठ्यपुस्तकांचा बदलता अभ्यासक्रमराज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून सर्वशिक्षण अभियानांतर्गत शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेतील मुलांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश असतो. मात्र, दुसरीकडे वर्षातून तसेच दोन वर्षांतून एकदा शालेय अभ्यासक्रम बदलत असल्याने पाठ्यपुस्तके ही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रद्दीच्या स्वरूपात विकली जातात.