शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

सातारी वारकऱ्यांचं रंगलं पुण्यात कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:46 IST

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या ...

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या मानाच्या दिंड्या सोडून लहान-मोठ्या प्रत्येक दिंडीने दोन दिवस दुपारी व रात्री चार मुक्काम झाले. प्रत्येक दिंडीने चार सातारकर रहिवासी भाविकांना भेट देऊन पुणेकरांना आनंद दिला. मानाच्या दिंड्या पालखी मुक्कामाच्या आसपास असतात. मात्र पुणेकर मंडळी त्यांना जेवणासह आवश्यक वस्तूंचे वाटप करून सेवा करत आहेत.पुणेस्थित सातारकरांनी दोन दिवस मुक्कामी माउली दिंडीसह गावाकडच्या ग्रामस्थांची मनो भावे सेवा केली. सातारा जिल्ह्यात जूनअखेर पाऊस पडला. खरीप पेरणीसह कोळपणी उरकून ग्रामीण भागातील तरुण मंडळीसह महिला, वडीलधारी शेतकरी माउलींची संख्या दोन्ही पालखी सोहळे एकत्र आल्याने यावर्षी मोठी दिसत होती.माउली ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान सोमवार, दि. ९ रोजी सकाळी सात वाजता होऊन हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची तर सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्यामुळे वारकरी मंडळींची चांगली व्यवस्था झाली.माउलीमय वातावरणात दोन दिवस दिंडयाची सेवा करताना पुणेकरांच्या चेहºयावर वेगळाच आनंद दिसत होता. मानाच्या दिंड्या सोडल्या तर इतर जिल्ह्यांतून येणाºया असंख्य दिंड्यातील माउलींची संख्या सरासरी सत्तर ते दीडशेच्या दरम्यान मर्यादित असते. नामस्मरणासह सर्व हेवेदावे विसरून लोक एकत्र आल्याचे चित्र दिसते.माउलीच्या पालखीबरोबर पायी चालत जाऊन माउली मुक्काम तळावर मिळेल तेथे जागा धरून, नामस्मरण, जेवण व झोपणे हा नित्यक्रम करणारी शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील माळकरी मंडळी किमान हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रत्येक वर्षी करत असतात. ही मंडळी डोक्यावर गाठोडे, मुखी नाम, रस्त्याला मिळेल तेथे भोजन, भूमातेचा निवारा, आभाळाचे छत करून पुढे मार्गक्रमण करत असतात.