शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारी वारकऱ्यांचं रंगलं पुण्यात कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:46 IST

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या ...

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.साताºयाहून आलेल्या मानाच्या दिंड्या सोडून लहान-मोठ्या प्रत्येक दिंडीने दोन दिवस दुपारी व रात्री चार मुक्काम झाले. प्रत्येक दिंडीने चार सातारकर रहिवासी भाविकांना भेट देऊन पुणेकरांना आनंद दिला. मानाच्या दिंड्या पालखी मुक्कामाच्या आसपास असतात. मात्र पुणेकर मंडळी त्यांना जेवणासह आवश्यक वस्तूंचे वाटप करून सेवा करत आहेत.पुणेस्थित सातारकरांनी दोन दिवस मुक्कामी माउली दिंडीसह गावाकडच्या ग्रामस्थांची मनो भावे सेवा केली. सातारा जिल्ह्यात जूनअखेर पाऊस पडला. खरीप पेरणीसह कोळपणी उरकून ग्रामीण भागातील तरुण मंडळीसह महिला, वडीलधारी शेतकरी माउलींची संख्या दोन्ही पालखी सोहळे एकत्र आल्याने यावर्षी मोठी दिसत होती.माउली ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान सोमवार, दि. ९ रोजी सकाळी सात वाजता होऊन हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची तर सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्यामुळे वारकरी मंडळींची चांगली व्यवस्था झाली.माउलीमय वातावरणात दोन दिवस दिंडयाची सेवा करताना पुणेकरांच्या चेहºयावर वेगळाच आनंद दिसत होता. मानाच्या दिंड्या सोडल्या तर इतर जिल्ह्यांतून येणाºया असंख्य दिंड्यातील माउलींची संख्या सरासरी सत्तर ते दीडशेच्या दरम्यान मर्यादित असते. नामस्मरणासह सर्व हेवेदावे विसरून लोक एकत्र आल्याचे चित्र दिसते.माउलीच्या पालखीबरोबर पायी चालत जाऊन माउली मुक्काम तळावर मिळेल तेथे जागा धरून, नामस्मरण, जेवण व झोपणे हा नित्यक्रम करणारी शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील माळकरी मंडळी किमान हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रत्येक वर्षी करत असतात. ही मंडळी डोक्यावर गाठोडे, मुखी नाम, रस्त्याला मिळेल तेथे भोजन, भूमातेचा निवारा, आभाळाचे छत करून पुढे मार्गक्रमण करत असतात.