शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

किकली होणार राज्यातील पहिलं ‘विरगळीचं गाव’! इतिहासाला उजाळा : संवर्धनासाठी युवा पिढी सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:26 IST

सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते.

ठळक मुद्देगावात सापडलेल्या सर्व विरगळी एकत्र करण्यात येणार आहेत.या विरगळी गावात एकाच ठिकाणी ठेवून त्याचे जतन करणारप्रत्येक विरगळीच्या बाजूला माहिती फलकाद्वारे दिली जाणार आहे.हा इतिहास पर्यटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी गावातील युवकांना प्रशिक्षण देऊन विविध भाषांही शिकविल्या जाणार आहेत.

सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते. वाई तालुक्यातील किकली या गावातही नवव्या, दहाव्या शतकातील पन्नास ते साठ विगरळी आढळून आल्या आहेत. हा विरगळींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा इतिहास जगापर्यंत पोहोचविण्यासाठी किकली हे गाव महाराष्ट्रातील पहिलं ‘विरगळीचं गाव’ म्हणून लवकरच नावारुपास येणार आहे.

वीरगळ हे एक स्मारक असते. एखाद्या शूरवीराच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केलेले असते. शूरवीर पुरुष अथवा स्त्रीने कोणत्या कारणास्तव आपल्या प्राणाची आहुती दिली, याचे स्पष्टीकरण वीरगळीमध्ये पाहावयास मिळते.भारतासह राज्यातील अनेक गावांमध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरात अशा प्रकारच्या विरगळी आजही पाहावयास मिळतात. किकली या गावातही अशा प्रकारच्या पन्नास ते साठ विरगळी आढळून आल्या आहेत.

आपल्या गावाला लाभलेल्या या प्राचीन शिलालेखांचे महत्त्व ओळखून गावातील युवापिढी संवर्धनासाठी पुढे सरसावली आहे. सर्व विरगळी एकत्र करून, त्यांचे जतन करण्यात येणार आहे. गड, किल्ले सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली या विरगळींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी किकली महाराष्ट्रातील पहिलं ‘विगरळीचं गाव’ म्हणून नावारुपास आणण्याचा निर्धार केला आहे.