शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:52 IST

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनुपस्थित सदस्यांकडून राजीनाम्याची मागणी

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामसभेच्या सुरुवातीलाच सतरापैकी पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेत विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना समजावी. तसेच ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी विषय वाचनास सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रश्नावर समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामसभा अर्ध्यावर सोडावी लागल्याची चर्चा सुरू आहे.विरोधकांनी घरकूलच्या प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी सूचना केली होती. परंतु, त्याला उत्तरे नसल्याने सत्ताधाºयांना काढता पाय घ्यावा लागला. ग्रामसभेला सुरुवात करण्यापूर्वीच सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाºयांनी ग्रामसभा शासकीय मुद्यावर असल्याचे सांगितल्याने विरोधक आक्रमक बनले.ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सरपंचांनी दिलेले उत्तर तसेच आठ दिवसांपूर्वी घरकूल संदर्भात लेखी अर्ज देऊनही कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत असल्याने विरोधक नाराज होऊन आक्रमक बनले. कोणत्याही मुद्यावर चर्चा न होता ही ग्रामसभा गुंडाळल्यामुळे विरोधकांनी ग्रामविकास अधिकाºयांना कोणत्याही प्रकारचे इतिवृत्त पूर्ण न करण्याचे लेखी निवेदन दिले. कोणासही विश्वासात न घेता ग्रामसभा कागदोपत्री दाखवून बोगस कारभार करणाºयांचा निषेध करत आहोत.- राहुल पाटील,अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठानलग्न तिथीमुळे सदस्य अनुपस्थितविकासाचा मुद्दा नसल्याने लोकांमध्ये चुकीचा मेसेज जावा, यासाठी हे काम सुरू आहे. विरोधकांच्या या गोष्टींमुळे विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. लग्नतिथी तसेच बुद्धपोर्णिमा असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती. राजीनामे मागण्यापेक्षा आगामी निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी टीका उपसरपंच बबनराव घाडगे यांनी केली.ग्रामसभा ही नियमानुसारच झाली आहे. विषय पत्रिकेतील विषयांवर वाचन करण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. वास्तविक विरोधकांना एवढे तरी माहीत असणे गरजेचे आहे की, गावच्या विकास कामावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे माध्यम आहे. परंतु विरोधकांनी राजकीय आखाडाच समजून गोंधळ घातला.- सुवर्णा पवार, सरपंच, खटाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण