शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:52 IST

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनुपस्थित सदस्यांकडून राजीनाम्याची मागणी

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामसभेच्या सुरुवातीलाच सतरापैकी पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेत विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना समजावी. तसेच ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी विषय वाचनास सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रश्नावर समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामसभा अर्ध्यावर सोडावी लागल्याची चर्चा सुरू आहे.विरोधकांनी घरकूलच्या प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी सूचना केली होती. परंतु, त्याला उत्तरे नसल्याने सत्ताधाºयांना काढता पाय घ्यावा लागला. ग्रामसभेला सुरुवात करण्यापूर्वीच सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाºयांनी ग्रामसभा शासकीय मुद्यावर असल्याचे सांगितल्याने विरोधक आक्रमक बनले.ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सरपंचांनी दिलेले उत्तर तसेच आठ दिवसांपूर्वी घरकूल संदर्भात लेखी अर्ज देऊनही कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत असल्याने विरोधक नाराज होऊन आक्रमक बनले. कोणत्याही मुद्यावर चर्चा न होता ही ग्रामसभा गुंडाळल्यामुळे विरोधकांनी ग्रामविकास अधिकाºयांना कोणत्याही प्रकारचे इतिवृत्त पूर्ण न करण्याचे लेखी निवेदन दिले. कोणासही विश्वासात न घेता ग्रामसभा कागदोपत्री दाखवून बोगस कारभार करणाºयांचा निषेध करत आहोत.- राहुल पाटील,अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठानलग्न तिथीमुळे सदस्य अनुपस्थितविकासाचा मुद्दा नसल्याने लोकांमध्ये चुकीचा मेसेज जावा, यासाठी हे काम सुरू आहे. विरोधकांच्या या गोष्टींमुळे विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. लग्नतिथी तसेच बुद्धपोर्णिमा असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती. राजीनामे मागण्यापेक्षा आगामी निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी टीका उपसरपंच बबनराव घाडगे यांनी केली.ग्रामसभा ही नियमानुसारच झाली आहे. विषय पत्रिकेतील विषयांवर वाचन करण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. वास्तविक विरोधकांना एवढे तरी माहीत असणे गरजेचे आहे की, गावच्या विकास कामावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे माध्यम आहे. परंतु विरोधकांनी राजकीय आखाडाच समजून गोंधळ घातला.- सुवर्णा पवार, सरपंच, खटाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण