शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:52 IST

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनुपस्थित सदस्यांकडून राजीनाम्याची मागणी

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामसभेच्या सुरुवातीलाच सतरापैकी पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेत विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना समजावी. तसेच ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी विषय वाचनास सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रश्नावर समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामसभा अर्ध्यावर सोडावी लागल्याची चर्चा सुरू आहे.विरोधकांनी घरकूलच्या प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी सूचना केली होती. परंतु, त्याला उत्तरे नसल्याने सत्ताधाºयांना काढता पाय घ्यावा लागला. ग्रामसभेला सुरुवात करण्यापूर्वीच सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाºयांनी ग्रामसभा शासकीय मुद्यावर असल्याचे सांगितल्याने विरोधक आक्रमक बनले.ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सरपंचांनी दिलेले उत्तर तसेच आठ दिवसांपूर्वी घरकूल संदर्भात लेखी अर्ज देऊनही कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत असल्याने विरोधक नाराज होऊन आक्रमक बनले. कोणत्याही मुद्यावर चर्चा न होता ही ग्रामसभा गुंडाळल्यामुळे विरोधकांनी ग्रामविकास अधिकाºयांना कोणत्याही प्रकारचे इतिवृत्त पूर्ण न करण्याचे लेखी निवेदन दिले. कोणासही विश्वासात न घेता ग्रामसभा कागदोपत्री दाखवून बोगस कारभार करणाºयांचा निषेध करत आहोत.- राहुल पाटील,अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठानलग्न तिथीमुळे सदस्य अनुपस्थितविकासाचा मुद्दा नसल्याने लोकांमध्ये चुकीचा मेसेज जावा, यासाठी हे काम सुरू आहे. विरोधकांच्या या गोष्टींमुळे विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. लग्नतिथी तसेच बुद्धपोर्णिमा असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती. राजीनामे मागण्यापेक्षा आगामी निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी टीका उपसरपंच बबनराव घाडगे यांनी केली.ग्रामसभा ही नियमानुसारच झाली आहे. विषय पत्रिकेतील विषयांवर वाचन करण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. वास्तविक विरोधकांना एवढे तरी माहीत असणे गरजेचे आहे की, गावच्या विकास कामावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे माध्यम आहे. परंतु विरोधकांनी राजकीय आखाडाच समजून गोंधळ घातला.- सुवर्णा पवार, सरपंच, खटाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण