शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:38 IST

दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत

ठळक मुद्देगाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानास प्रारंभ

खटाव : दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत आत्मविश्वास व श्रमाच्या बळावर निश्चितच यश मिळवणार असा निर्धार ग्रामस्थानी व्यक्त केला. 

सगळा गाव सोमवारी रात्री बारा वाजता जागा झाला आणि हातात मशाल घेऊन तुळजाभवानी तसेच निनाई देवीचा आशिर्वाद घेऊन गावातून मशाल फेरी काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. टॅक्टर, ट्रॉली, दुचाकी तर काहीजण चालत रॅलीत सहभागी झाले. ओसाड असणाºया माळरानावर सर्वांना एकत्र बसून ४५ दिवसांत करावयाच्या कामाचे नियोजन सांगितले. 

मध्यरात्री मशालीच्या उजेडामध्ये माळराणावर कुदळ, फावडे तसेच गाण्याच्या तालावर काळ्या मातीची सेवा करण्याचे काम सुरु झाले. यामध्ये सहभागी सर्व गावकरी, महिला, युवक युवती अगदी एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे कामाला लागले होते. वयोवृध्द लोकही दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी तरुणाईच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर