शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

खरीप कांदा, रडविणार यंदा!

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

पावसाची हुलकावणी : फलटणचा पश्चिम भाग नापेर राहण्याची भीती

आदर्की : जोरदार वादळी वारे, गारपीट आणि पावसाने झालेल्या नुकसानीनंतरही आदर्की भागातील शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बळीराजा पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र जुलैचा मध्य ओलांडल्यानंतरही अद्याप पाऊस सुरु न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.खरीप हंगामात या भागात प्रामुख्याने हळवा कांदा, मका, बाजरी आदी पिके घेतली जातात. पाऊस अद्याप सुरू झाला नसल्याने खरीप नापेर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भागात होणारे प्रामुख्याने कांद्याचे पीक शेतकऱ्याला चांगला आधार देऊन जाते. त्याद्वारे नंतरच्या रब्बी पिकांचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरत असल्याने खरिपातील कांद्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पावसाअभावी अद्याप कांद्याच्या लागणी होऊ शकल्या नसल्याने आर्थिक साथ देणारा कांदा आणि कुंटुबाच्या पालनासाठी होणारी बाजरी, जनावरांसाठी होणारी मका,पावसाअभावी अद्याप पेरणी न झाल्याचे सर्वच आघाड्यावर शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भागात होणाऱ्या परतीच्या मान्सुनवरच येथील रब्बीचे पिके घेतली जातात. परतीचा मान्सून बेभरवशी असल्याने या भागातील शेतकरी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसावर घेतलेल्या खरीप पिकांचाच आधार मानतो आणि यावर्षी खरीप नापेर राहिला तर काय या विंवंचनेत शेतकरी आहे. (वार्ताहर)