शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

खापरी लाइन ते बंदिस्त पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

सचिन काकडे सातारा शहराच्या जवळपास कोठेही मोठा तलाव अथवा नदी नाही. त्यामुळे हे शहर वसविताना राज्यकर्त्यांनी शहरात सर्वप्रथम ...

सचिन काकडे

सातारा शहराच्या जवळपास कोठेही मोठा तलाव अथवा नदी नाही. त्यामुळे हे शहर वसविताना राज्यकर्त्यांनी शहरात सर्वप्रथम पाणी खेळविले. सातारा शहराला प्रथम पाणी आले ते यवतेश्वर मंदिरामागे असलेल्या तलावातून. शहरात पाणी आल्यानंतर प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी पाणी वितरण व्यवस्था वाढविण्यासाठी ती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे हौद व तलावांची निर्मिती करण्यात आली. आज अस्तित्वात असलेली महादरे, मंगळवार, मोती, फुटका, रिसालदार ही तळी त्या काळच्या पाणी व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा होती.

शहराच्या पश्चिमेला असलेल्या महादरे तळ्याची उभारणी १८२३ रोजी करण्यात आल्याची नोंद सरकारी दप्तरी आढळते. २६५ फूट लांब व २५० फूट रुंद व दगडी बांधकाम असलेल्या तळ्याकडे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिलं जातं. शहरात जेव्हा नवीन राजवाड्याचे बांधकाम झाले तेव्हा बांधकामासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. या खड्ड्याच्या ठिकाणी औंधचे पंतप्रतिनिधी यांनी आखीवरेखीव तळे बांधले. पुढे हेच तळे मंगळवार तळे म्हणून ओळखले जाऊ लागले.

शहरातील फुटका तलाव मोती व रिसालदार तळ्यांनादेखील इतिहासाची किनार आहे. त्या काळी पाणी वितरण व्यवस्थेचा सर्वांत महत्त्वाचा दुवा असलेली अनेक तळी व हौद सिमेंटच्या जंगलात लुप्त झाली. सातारा शहराला पूर्वी या हौद व तळ्यातूनच पाणीपुरवठा केला जात होता.

जसजशी लोकवस्ती वाढत गेली, शहराचा विस्तार होत गेला तसतशी पाण्याची गरजही भासू लागली. आज सातारा शहराला कास व उरमोडी नदीवर असलेल्या शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. खापरी लाइनपासून सुरू झालेला पाणी वितरण व्यवस्थेचा प्रवास आता बंदिस्त जलवाहिनीपर्यंत येऊन थांबलाय. पाण्याचे महत्त्व जुन्या लोकांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी तळी व हौदांचे कायमच संवर्धन केले. मात्र, आपण हा ऐतिहासिक ठेवा पुसून टाकण्याचे काम करीत आहोत. पाणी व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या या पाऊलखुणा विस्मृतीत जाण्यापूर्वी त्यांच्या संवर्धनासाठी सातारकरांनी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे.

फोटो :