शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भूमी अभिलेखमध्ये वाढतोय खाबूगिरीचा आलेख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

खंडाळा : शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे व्यवहार सुरळीत व्हावेत. त्यांची मोजणी करून नकाशा मिळावा, यासह इतर कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनता ...

खंडाळा : शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे व्यवहार सुरळीत व्हावेत. त्यांची मोजणी करून नकाशा मिळावा, यासह इतर कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारत असतात. मात्र, या कार्यालयात कागदपत्रांच्या आडून लोकांना त्रास देण्यास उद्योग राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येते. लोकांना किरकोळ कामांसाठीही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील खाबूगिरीचा वाढता आलेख कसा खुंटणार, हा यक्ष प्रश्न आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जनतेला दिलासा द्यावा, ही माफक अपेक्षा लोकांची आहे.

खंडाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल घडला आहे. तालुक्यात वसलेली औद्योगिक वसाहत यासाठी प्रमुख कारण बनलेली आहे. नवीन औद्योगिक वसाहतीमुळे इथल्या जमिनींना सोन्याचे भाव आले आणि खरेदी-विक्रीच्या उलाढालीही मोठ्या प्रमाणात झाल्या. आजही या अनुषंगाने मोठमोठी कामे सुरू आहेत. त्याचबरोबर शेतीचे मूल्य समजल्याने इथला शेतकरी जागृत झाला आहे. आपली उर्वरित जमीन नीटनेटकी ताब्यात राहावी, यासाठी प्रत्येक जण त्याची मोजदाद करण्याच्या मागे धावतो आहे.

जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करणे, त्याचे चलन भरणे, प्रत्यक्ष मोजणी करणे, चतु:सीमा ठरवणे, नकाशा तयार करणे या कामांसाठी खेडोपाड्यांतील लोक भूमी अभिलेख कार्यालयात खेटे घालत असतात. मात्र, या कामांच्या पूर्ततेसाठी चिरीमिरीची मागणी करून लोकांची अडवणूक केली जाते. मोजणीसाठी चलन भरायचे असते. मात्र, ते चलन काढण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा अनेक जणांनी अनुभव घेतला आहे, तर साधा नकाशा काढण्यासाठी शोधणाऱ्या शिपायापासून कक्ष अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाचा वाटा वेगळा असतो. त्याशिवाय कागद हातात पडत नाही. मोजणीसाठी भूमापकाला गावापर्यंत नेण्याची सोय करणे, त्यांना भत्ता देणे हे तर जणू काही सक्तीचेच असल्याचे दिसून येते. मात्र, सामान्य माणसाला याबाबत बोलताही येत नाही आणि काही करताही येत नाही. कोणाकडे काही सांगावे, तर कामात विनाकारण त्रुटी काढल्याने अडून पडण्याची भीती वाटते. त्यामुळे मूग गिळून गप्प बसण्यापलीकडे त्यांना मार्गच नसतो. त्यामुळेच या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

चौकट...

वेळेचा धाक...

गावोगावचा सामान्य शेतकरी आपली कामे आटोपून वेळ मिळेल तसा तालुक्याला येत असतो. आपले काम होईल, ही भाबडी आशा त्याला असते. मात्र, या कार्यालयात दुपारी १ वाजेनंतर अर्जही स्वीकारले जात नाहीत. कित्येकदा लोकांना माघारी जावे लागते. येण्या-जाण्याच्या खर्चाचा भार मात्र त्यांना सहन करावा लागतोच. शिवाय या वेळेच्या धाकामुळे पुन्हा खेटे मारावे लागतात.

चौकट..

अनावश्यक पैसे देण्याची सवय...

खंडाळ्यात वाढत्या औद्योगिकीकरणाने अनेक मोठ्या लोकांनी, गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदी केल्या. याबाबतची कामे तातडीने व्हावीत, यासाठी शासकीय कार्यालयात अनावश्यक पैसे देण्याची सवय लावली. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सामान्य शेतकऱ्यांकडूनही तशीच अपेक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे कामे करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

.........................................