शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

किल्ली पोटात... चिंचोका नाकात अन् पेन्सिल कानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

सातारा : मुलं वाढवणं वाटतंय तेवढं खरंच सोपे राहिलेले नाही. खेळ सुरू असताना किल्ली गिळणे, चिंचोका नाकात घालणे आणि ...

सातारा : मुलं वाढवणं वाटतंय तेवढं खरंच सोपे राहिलेले नाही. खेळ सुरू असताना किल्ली गिळणे, चिंचोका नाकात घालणे आणि पेन्सिल कानात घालण्याचे प्रकार बालकांच्यात पाहायला मिळतात. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ अशी अवस्था होत असल्याने या बाललीला कुटुंबियांची अक्षरश: भंबेरी उडवत आहेत.

वाढत्या वयात मुलांच्या लीला बघण्यात कुटुंबीय व्यस्त असतात; पण त्यांची एखादी कृती अवघ्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे घरात रांगणारं बाळ असेल तेव्हा हाताला येतील अशा वस्तू न ठेवणं आणि त्याच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देणं आवश्यक असते. खेळता-खेळता खिळा, सेल, नाणे, सेप्टी पीन गिळल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग यासाठी वरदायी ठरते. विनाशस्त्रक्रिया एण्डोस्कोपीच्या मदतीने यशस्वी आणि कमी त्रासाचे उपचार होतात. अमुक करो नको, असं पालक लहानग्यांना सांगतात, म्हणूनही मुलं करून बघतात आणि असे अपघात होतात, असे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

१. मुलं काय करतील त्याचा नेम नाही

नाकात चिंचोका, वाटाणा आणि शेंगदाणा घालणं हे मुलांचे आवडीचे प्रकार आढळतात. त्यांच्या आकारामुळे नाकपुडीत ते गेले की पुन्हा हाताने काढायचा प्रयत्न केला तरीही ते अडकून बसते.

बाळ झोपलं म्हणून आईने कपाट आवरायला घेतलं. कपाटाच्या लॉकरची अगदी छोटीशी चावी अनावधानाने बेडवरच राहिली. बाळ उठल्यावर त्याने हातात किल्ली घेतली आणि आई त्याकडे बघेपर्यंत चक्क ती किल्ली गिळली गेली. एक्सरेमध्ये ही किल्ली स्पष्ट दिसली. त्यानंतर पुढे चार दिवस बाळाच्या शी तून किल्ली बाहेर पडतेय का हे पाहण्यासाठी अख्खं कुटुंब जुंपले होते.

२. रडणारी बाळं हेच मोठं आव्हान

सहा महिन्यांपासून अगदी तीन वर्षांपर्यंतची मुलं निव्वळ उत्सुकतेपोटीच वस्तू कान, नाक आणि तोंडात घालतात. अनेकदा सर्दी असल्याने मुलं नाकात बोटं घालत असतात. त्याचवेळी त्यांच्या हातात जर छोटी वस्तू असेल तर ती नाकात अडकून बसते. त्यानंतर ते दुखायला लागलं की बाळ रडायला लागतं. लाख प्रयत्न करूनही बाळ शांत होत नाही म्हणून पालक रुग्णालयात येतात. त्यानंतर रडणारी ही बाळं तपासणं, त्यांना कुठं हात लागला, ते ओरडतात याची तपासणी करावी लागते. बोलायला येणारी बाळं बरी, पण बाेलता न येणाऱ्या बाळांचे निदान करणं हे आव्हान असते.

३. अशी घ्या मुलांची काळजी

खेळताना होणारे अपघात हे मुलांच्या औत्सुक्यामुळे होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुलांच्या मनातील शंका निरसन करणं आवश्यक आहे. बसायला आणि रांगायला लागलेल्या बाळांना गरम वस्तूने चटका बसतो, हे कृतीतून शिकवणं महत्त्वाचं आहे. तान्ह्या बाळांसाठी तर निव्वळ बारीक लक्ष ठेवणं आणि त्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करणं हाच पर्याय उरतो.

४. कोट

लहान मुलांच्या करामती पालकांची झोप उडवतात. उत्सुकता म्हणून मुलांनी केलेले हे कृत्य त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचं आहे. नाकात काही अडकलं तर शिंक यावी म्हणून पालक तपकीर ओढायला लावतात. यामुळे नाकात अडकलेले श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा थेट तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचे.

- डॉ. दीपक थोरात, बालरोगतज्ज्ञ